शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रोगराई पसरु नये यासाठी महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम गतीने राबवा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 18:29 IST

Collector Flood sangli : नागरी भागात शिरलेले पुराचे पाणी ओसरु लागले आहे. त्यामुळे चिखल व इतर भिजलेल्या साहित्यामुळे रोगराई पसरु नये यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम गतीने राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

ठळक मुद्देस्वच्छतेसाठी 200 वाहनांसह मशिनरी, 2 हजार अधिकारी कर्मचारीसांगली महानगरपालिका क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता पथक कार्यरत

सांगली : नागरी भागात शिरलेले पुराचे पाणी ओसरु लागले आहे. त्यामुळे चिखल व इतर भिजलेल्या साहित्यामुळे रोगराई पसरु नये यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम गतीने राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील गणपती पेठ, कृष्णामाई घाट, भाजी मंडई, साठे नगर, सिध्दार्थ नगर या भागाची पाहणी केली. यावेळी महापालका आयुक्त नितिन कापडनीस, उपायुक्त राहुल रोकडे, चिफ सॅनिटरी इन्सपेक्टर अविनाश पाटणकर आदी उपस्थितीत होते.पूरग्रस्त भागाची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात असून 8 ते 10 क्षेत्र पाण्याखाली आहे. तरीही ज्या भागातील पाणी पुर्णपणे ओसरले आहे. त्या भागात स्वच्छता मोहिम तातडीने सुरु करण्यात यावी. स्वच्छते मोहिमेसाठी आरोग्य पथकांना ज्या भागात स्वच्छता मोहिम प्राधान्याने राबविणे आवश्यक आहे त्या ठिकाणी पाठविण्यात यावे.

ज्या भागातील ड्रेनेज सिस्टीम तुंबले आहे त्याचा निचरा तातडीने होईल यासाठी प्रयत्न करावेत. ज्या ठिकाणी अडचणी आहेत. त्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्याची योग्य पध्दतीने नियोजन करण्यात यावे.

पुढे म्हणाले, निवारा केंद्रातील काही कुटुंबे आपआपल्या घरी परतत आहेत तसेच घरांच्या परिसराची स्वच्छता करत आहेत. अशा वेळी दक्षता घेवून स्वच्छता करावी. विशेषत: विद्युत उपकरणे सुरु करताना दक्ष रहावे. महापालिकेच्यावतीने पूर काळात करण्यात ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या आधारे 2021 ची पूररेषा निश्चित करावी.

त्याचबरोबर त्याचे अभिलेखे तयार करावी तसेच बाधित ठिकाणांची वस्तुनिष्ठ पंचनामे करावे. लॅप्टोस्पारसेसची साथ पसरु नये यासाठी प्रतिबंधक गोळ्याचे वाटप सुरु करावे. तसेच मशिनरीने औषध फवारणी सुरु करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस यावेळी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील ज्या ज्या भागातील पाणी ओसरले आहे त्या त्या भागात महापालिकेच्या 200 वाहने व मशिनरी तसेच 2 हजार अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून आलेले स्वच्छता पथकही कार्यरत झाले आहे.

शहरातील तातडने कुजणारे पदार्थ व कागद यांच्या स्वच्छतेबरोबरच ज्या भागात पाण्यामुळे 1 ते 2 फुट माती सदृश्य गाळ साचला आहे. या भागात प्राधान्याने स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या बहुतांश योजना सुरु करण्यात आल्या असून ज्या योजना बंद आहेत त्याची तात्काळ दुरुस्ती करुन त्याही तातडीने सुरु करण्यात येणार आहेत. नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरु करण्यात आली आहेत. 

टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली