शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

शहरातील नर्सरी, केजीच्या ५ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST

सांगली : गेल्या वर्षभरापासून ‘स्कूल चले हम...’ असे म्हणत पाठीवर बॅग घेऊन शाळेत जाण्यापासून मुले वंचित राहिली आहेत. कोरोनामुळे ...

सांगली : गेल्या वर्षभरापासून ‘स्कूल चले हम...’ असे म्हणत पाठीवर बॅग घेऊन शाळेत जाण्यापासून मुले वंचित राहिली आहेत. कोरोनामुळे सर्वच शाळा कुलूपबंद झाल्या आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. आता तर लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नर्सरी व केजीच्या ५ हजार मुलांचे पुढील शैक्षणिक वर्षही घरातच जाणार आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात नर्सरी व केजीच्या ५०हून अधिक शाळा आहेत. त्यात दरवर्षी साडेचार हजार ते पाच हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. गेल्या वर्षी मार्चपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वच शाळा कुलूपबंद झाल्या होत्या. दिवाळीनंतर शाळा सुरू होतील, अशी आशा होती. पण कालांतराने तीही फोल ठरली. केवळ नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. पण नर्सरी, लहान गट, मोठा गटाच्या शाळा मात्र बंदच राहिल्या. त्या आजतागायत बंदच आहेत.

लवकरच यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. पण, या शैक्षणिक वर्षातही शाळा सुरू होण्याची शक्यता धुसर आहे. पुढील टप्प्यात लहान मुलांना कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नर्सरी, केजीच्या शाळा बंदच राहतील. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना यंदाही ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागणार आहे.

चौकट

वर्षभर कुलूप, यंदा?

- कोरोनाच्या महामारीमुळे वर्षभर शाळा बंदच आहेत. त्यात शाळांचा दैनंदिन खर्च, शिक्षकांचे पगार सुरू आहेत. हा खर्च भागविणे संस्थाचालकांना कठीण झाले आहे. पालकही फी देण्याबाबत उदासीन आहेत. अशातच यंदाची स्थितीही अजून स्पष्ट नाही. त्यामुळे संस्थांसह मुलांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.

- कपिल रजपूत - संस्थाचालक

- कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी संस्थेच्यावतीने मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणात काही अडचणी असल्या तरी त्या दूर करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचे काम केले आहे. - सुशांत शहा, संस्थाचालक

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून शाळा बंद आहेत. पण संस्थेचा खर्च कमी झालेला नाही. त्यात नर्सरी, केजीचाही समावेश आहे. हे संकट लवकर निवळले नाही तर मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. - विनोद मोहिते, संस्थाचालक

चौकट

मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम, ही घ्या काळजी

मुले घरातच असल्याने हट्टी, चिडचिडी बनतात. शाळा बंदमुळे त्यांचा सामाजिक, भावनिक विकास खुंटतो. त्यामुळे अशा काळात मोबाईल, टीव्हीपेक्षा पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालविला पाहिजे. त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे. - डाॅ. पवन गायकवाड, मनसोपचारतज्ज्ञ, सांगली

चौकट

- पालकही परेशान

वर्षभरापासून मुले घरीच आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्यांना मोबाईलचे व्यसन लागण्याची भीती आहे. शिवाय डोळे, आरोग्यावरही परिणामाची चिंता आहे. - स्नेहल खोत

- मुले घरातच असल्याने चिडचिडी बनली आहेत. त्यांच्या आवडीनिवडी आम्ही सांभाळतो. पण शिक्षणाविषयीची चिंता कमी झालेली नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, इतकीच अपेक्षा आहे. - रेखा बोळाज

- कोरोनाच्या पुढच्या टप्प्यात लहान मुलांना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे मुलांना शाळेत कसे पाठवायचे, शाळा सुरू होणार की नाही, याची काळजी लागली आहे. सध्या तरी आम्ही त्यांच्या आरोग्याला प्राथमिकता दिली आहे. - शीतलकुमार माने

चौकट

शहरातील नर्सरी टू केजीच्या शाळा

२०१८-१९ : ५०

विद्यार्थी संख्या : ३७००

२०१९-२० : ५०

विद्यार्थी संख्या : ४६००

२०२०-२१ : ५०

विद्यार्थी संख्या : ५२००