शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पाऊस नाही, तरीही धास्तीने स्थलांतराची तयारी; सांगलीतील परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:31 IST

गेल्या काही वर्षांत सातत्याने पुराचा सामना नागरिकांना करावा लागल्याने येथील नागरिकांच्या मनात सध्या चिंतेचे वातावरण आहे.

सांगली : पावसाळा अद्याप सक्रिय झाला नसतानाही सांगलीत महापुराची चर्चा सुरू झाली आहे. पूर येणार, असे गृहीत धरून नदीकाठचे नागरिक व व्यापाऱ्यांनी आतापासूनच स्थलांतराची तजवीज केली आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने पुराचा सामना नागरिकांना करावा लागल्याने येथील नागरिकांच्या मनात सध्या चिंतेचे वातावरण आहे.सांगलीत मागील तीन वर्षांत महापुराने व्यापारी पेठा व नागरी वस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐनवेळी होणारी तारांबळ येथील लोकांनी अनुभवली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच लोकांनी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी भाड्याने  खोल्यांचे बुकिंग करण्यास किंवा नातेवाईकांना कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांतच पुराची टांगती तलवार नदीकाठच्या नागरिकांत असते.

सांगलीतील व्यापाऱ्यांकडून सतर्कता

  • सांगलीच्या गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड, कापड पेठ याठिकाणी सातत्याने पुराचा फटका बसत आहे. त्यामुळे पावसाळा म्हटला की, याठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या अंगावर काटा येतो.
  • २०२१ मध्ये महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी आतापासूनच माल शहराबाहेरील गोदामात हलविण्यास व काहींनी तळघरातील माल काढून अन्यत्र ठेवण्यास सुरुवात केली आहे. 

नागरिकांचीही पूर्वतयारीनदीकाठच्या नागरिकांनीही ऐनवेळी धावाधाव नको, म्हणून नातेवाईकांना स्थलांतराबाबत पूर्वकल्पना दिली आहे. काहींनी तर दोन महिन्यांसाठी भाड्याने खोली शोधणे चालू केले आहे. मागच्या महापुरात अनेक नागरिकांना खोल्या मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे अगाऊ भाडे देऊन खोल्या बुकिंगची मानसिकता करण्यात आली आहे.

चिंता नुकसानीचीशासनाकडून नुकसानीएवढी मदत कधीच मिळत नसल्याने नदीकाठचे नागरिक व व्यापारी केवळ नुकसान टाळण्यासाठी धडपडत आहेत. एकीकडे शेतीसाठी पावसाची प्रतीक्षा केली जात असताना, दुसरीकडे जादा पाऊस पडू नये, म्हणून नदीकाठचे नागरिक, व्यापारी प्रार्थना करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर