शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काँग्रेसच्या बैठकीत पराभवाचे मंथन : मोठी सभा न झाल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:45 IST

भविष्यात चांगली कामगिरी येथे करता येऊ शकते. प्रतापसिंह रजपूत यांनीही, सांगलीतील काँग्रेसची लढत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून, हा पराभव टाळता येऊ शकत होता, असे मत मांडले.

ठळक मुद्दे प्रदेश कार्यकारिणीकडून अपेक्षा

सांगली : विधानसभा निवडणुकीत सांगली, मिरज या दोन्ही मतदारसंघात झालेल्या पराभवाचे मंथन बुधवारी सांगलीतील काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी, सांगली, मिरजेत मोठ्या नेत्यांच्या सभा न झाल्याने पराभव झाल्याचे मत मांडले. तासाभराच्या चिंतनानंतर, पुन्हा नव्या जोमाने मतदारसंघात ताकद वाढविण्याचा निर्धारही करण्यात आला.

 

सांगलीत काँग्रेस भवनात दुपारी दोन वाजता जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सांगली, मिरजेतील काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले की, सांगलीत काँग्रेसला निसटता पराभव स्वीकारावा लागला. वास्तविक विजयाची शंभर टक्के खात्री होती. पक्षस्तरावरून आणखी बळ मिळायला हवे होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा सांगलीत झाल्या असत्या, तर निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला असता. भविष्यात अशाप्रकारचे दुर्लक्ष टाळायला हवे.

मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे म्हणाले की, सांगली, मिरजेतील नागरिकांच्या मतांचा कौल पाहिला, तर तो भाजपविरोधी होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान काँग्रेसला झाले आहे. आणखी थोडे काटेकोर नियोजन केले असते, तर या दोन्ही जागांवर काँग्रेसला विजय मिळविणे शक्य झाले असते.

दिलीप पाटील म्हणाले की, पलूस-कडेगाव येथे ज्यापद्धतीने वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या, तशा सभा सांगलीत होणे गरजेचे होते. मोठ्या सभांमुळे मतपरिवर्तन होऊ शकते. सांगली जिल्हा अजूनही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भविष्यात चांगली कामगिरी येथे करता येऊ शकते. प्रतापसिंह रजपूत यांनीही, सांगलीतील काँग्रेसची लढत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून, हा पराभव टाळता येऊ शकत होता, असे मत मांडले.

आटपाडी तालुकाध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले की, जिल्'ातील दोन जागा मिळाल्याने ऊर्जा मिळाली असताना, या दोन जागांची भर पडली असती तर आणखी आनंद झाला असता.यावेळी बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब उपाध्ये, शिराळ्याचे रवी पाटील, खानापूरचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, विट्याचे सूर्यकांत पाटील, बी. डी. पाटील, डॉ. राजेंद्र मेथे, शेवंता वाघमारे, बिपीन कदम, सनी धोत्रे आदी उपस्थित होते.मी खचलो नाही : पृथ्वीराज पाटीलकाँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, माझा पराभव झाला असला तरी, ८७ हजार नागरिकांनी माझ्या बाजूने कौल दिला आहे. पराभवाने मी खचलेलो नाही. उलट आपत्तीकाळात नागरिकांशी संवाद साधून मी पक्षाचे कार्य सुरू केले आहे. पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी यांनी जी साथ दिली, त्याबद्दल मी समाधानी आहे.चुका टाळून पुढे जाऊ : मोहनराव कदमजिल्हाध्यक्ष कदम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला नियोजनात काही चुका झाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. पराभवाची कारणमीमांसा प्रत्येकाने केली पाहिजे. कारणांचा शोध घेतल्यानंतर त्या चुका टाळून आपण पुढे गेले पाहिजे. भविष्यात जिल्'ातील पक्षीय संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकसंधपणे आपण सर्वजण कार्यरत राहू.

 

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली