शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

मिरची व मसाला वीस टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 13:51 IST

सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे.

सांगली : घरासाठी चटणीची वर्षभराची जुळणी करण्याचा गृहिणींचा हंगाम लॉकडाऊनमध्येच संपण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात आठवडा बाजार बंद असल्याने मिरची व मसाला मिळणे मुश्किल झाले आहे. सांगली बाजारात मोजकाच साठा उपलब्ध आहे. वाहतुकीअभावी नवी आवक बंद असल्याने मसाला भाव खाऊ लागला आहे.

मिरचीचे दर स्थिर आहेत, मात्र मसाल्याच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी भडकल्या आहेत. मिरची व मसाल्याचा बाजार जानेवारीपासून जूनपर्यंत चालतो. नेमके हेच दिवस कोरोनाच्या थैमानात सापडले आहेत. सध्या सांगलीत बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांकडे जेमतेम उलाढाल सुरु आहे. गेल्यावर्षीपेक्षा ५० ते ७० टक्क्यांनी ग्राहक घटल्याचे घाऊक व्यापारी विजय पाटील यांनी सांगितले.

सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे.

येथून येतो मिरची व मसाला...सांगली बाजारपेठेत मुंबई, गुजरात, केरळ येथून मिरची व मसाल्याची आवक होते. वाहतूक बंद असल्याने नवी आवक थांबली आहे. माल उतरवून रिकामे परतणे परवडत नसल्यानेही वाहने यायला तयार नाहीत. त्यामुळे शीतगृहातील मिरचीवरच बाजार समितीतील दुकाने सुरु आहेत. तेथील साठा संपला की, जिल्ह्यात मिरचीची टंचाई निर्माण होईल. 

असा आहे मिरची बाजार...गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरची फार महागलेली नाही. ग्राहक नसल्याचाही हा परिणाम असावा. देशी व संकेश्वरी मिरची १५० ते १७० रुपये किलोने विकली जात आहे. यातील चांगल्या दर्जाची मिरची २०० रुपये किलोने उपलब्ध आहे. गुंटूर १३० ते १६० दरम्यान आहे. ब्याडगी मिरची मात्र भाव खात असून तिला प्रतीनुसार २०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. हे सर्व दर घाऊक बाजारातील असून पाच टक्के जीएसटी व तीन टक्के अडत जादा द्यावी लागते. जिरे, मोहरी, धने, ओवा हा मसाला प्रामुख्याने गुजरातहून येतो. त्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी भडकले आहेत. केरळहून येणारी मिरी, दालचिनी, खोबरे, तमालपत्र यांची नवी आवक बंद असल्याने दरवाढ झाली आहे.

 

मिरची व मसाल्याचा अर्धा हंगामा लॉकडाऊनमध्येच संपला आहे. संचारबंदीमुळे जिल्हाभरातील ग्राहक सांगलीला फिरकला नाही. दरवर्षीपेक्षा २५ टक्केही उलाढाल झालेली नाही. नवी आवक नसल्याने दरवाढ झाली आहे.- विजय पाटील, घाऊक व्यापारी, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय