शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिरची व मसाला वीस टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 13:51 IST

सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे.

सांगली : घरासाठी चटणीची वर्षभराची जुळणी करण्याचा गृहिणींचा हंगाम लॉकडाऊनमध्येच संपण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात आठवडा बाजार बंद असल्याने मिरची व मसाला मिळणे मुश्किल झाले आहे. सांगली बाजारात मोजकाच साठा उपलब्ध आहे. वाहतुकीअभावी नवी आवक बंद असल्याने मसाला भाव खाऊ लागला आहे.

मिरचीचे दर स्थिर आहेत, मात्र मसाल्याच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी भडकल्या आहेत. मिरची व मसाल्याचा बाजार जानेवारीपासून जूनपर्यंत चालतो. नेमके हेच दिवस कोरोनाच्या थैमानात सापडले आहेत. सध्या सांगलीत बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांकडे जेमतेम उलाढाल सुरु आहे. गेल्यावर्षीपेक्षा ५० ते ७० टक्क्यांनी ग्राहक घटल्याचे घाऊक व्यापारी विजय पाटील यांनी सांगितले.

सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे.

येथून येतो मिरची व मसाला...सांगली बाजारपेठेत मुंबई, गुजरात, केरळ येथून मिरची व मसाल्याची आवक होते. वाहतूक बंद असल्याने नवी आवक थांबली आहे. माल उतरवून रिकामे परतणे परवडत नसल्यानेही वाहने यायला तयार नाहीत. त्यामुळे शीतगृहातील मिरचीवरच बाजार समितीतील दुकाने सुरु आहेत. तेथील साठा संपला की, जिल्ह्यात मिरचीची टंचाई निर्माण होईल. 

असा आहे मिरची बाजार...गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरची फार महागलेली नाही. ग्राहक नसल्याचाही हा परिणाम असावा. देशी व संकेश्वरी मिरची १५० ते १७० रुपये किलोने विकली जात आहे. यातील चांगल्या दर्जाची मिरची २०० रुपये किलोने उपलब्ध आहे. गुंटूर १३० ते १६० दरम्यान आहे. ब्याडगी मिरची मात्र भाव खात असून तिला प्रतीनुसार २०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. हे सर्व दर घाऊक बाजारातील असून पाच टक्के जीएसटी व तीन टक्के अडत जादा द्यावी लागते. जिरे, मोहरी, धने, ओवा हा मसाला प्रामुख्याने गुजरातहून येतो. त्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी भडकले आहेत. केरळहून येणारी मिरी, दालचिनी, खोबरे, तमालपत्र यांची नवी आवक बंद असल्याने दरवाढ झाली आहे.

 

मिरची व मसाल्याचा अर्धा हंगामा लॉकडाऊनमध्येच संपला आहे. संचारबंदीमुळे जिल्हाभरातील ग्राहक सांगलीला फिरकला नाही. दरवर्षीपेक्षा २५ टक्केही उलाढाल झालेली नाही. नवी आवक नसल्याने दरवाढ झाली आहे.- विजय पाटील, घाऊक व्यापारी, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय