शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

मिरची व मसाला वीस टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 13:51 IST

सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे.

सांगली : घरासाठी चटणीची वर्षभराची जुळणी करण्याचा गृहिणींचा हंगाम लॉकडाऊनमध्येच संपण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात आठवडा बाजार बंद असल्याने मिरची व मसाला मिळणे मुश्किल झाले आहे. सांगली बाजारात मोजकाच साठा उपलब्ध आहे. वाहतुकीअभावी नवी आवक बंद असल्याने मसाला भाव खाऊ लागला आहे.

मिरचीचे दर स्थिर आहेत, मात्र मसाल्याच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी भडकल्या आहेत. मिरची व मसाल्याचा बाजार जानेवारीपासून जूनपर्यंत चालतो. नेमके हेच दिवस कोरोनाच्या थैमानात सापडले आहेत. सध्या सांगलीत बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांकडे जेमतेम उलाढाल सुरु आहे. गेल्यावर्षीपेक्षा ५० ते ७० टक्क्यांनी ग्राहक घटल्याचे घाऊक व्यापारी विजय पाटील यांनी सांगितले.

सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे.

येथून येतो मिरची व मसाला...सांगली बाजारपेठेत मुंबई, गुजरात, केरळ येथून मिरची व मसाल्याची आवक होते. वाहतूक बंद असल्याने नवी आवक थांबली आहे. माल उतरवून रिकामे परतणे परवडत नसल्यानेही वाहने यायला तयार नाहीत. त्यामुळे शीतगृहातील मिरचीवरच बाजार समितीतील दुकाने सुरु आहेत. तेथील साठा संपला की, जिल्ह्यात मिरचीची टंचाई निर्माण होईल. 

असा आहे मिरची बाजार...गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरची फार महागलेली नाही. ग्राहक नसल्याचाही हा परिणाम असावा. देशी व संकेश्वरी मिरची १५० ते १७० रुपये किलोने विकली जात आहे. यातील चांगल्या दर्जाची मिरची २०० रुपये किलोने उपलब्ध आहे. गुंटूर १३० ते १६० दरम्यान आहे. ब्याडगी मिरची मात्र भाव खात असून तिला प्रतीनुसार २०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. हे सर्व दर घाऊक बाजारातील असून पाच टक्के जीएसटी व तीन टक्के अडत जादा द्यावी लागते. जिरे, मोहरी, धने, ओवा हा मसाला प्रामुख्याने गुजरातहून येतो. त्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी भडकले आहेत. केरळहून येणारी मिरी, दालचिनी, खोबरे, तमालपत्र यांची नवी आवक बंद असल्याने दरवाढ झाली आहे.

 

मिरची व मसाल्याचा अर्धा हंगामा लॉकडाऊनमध्येच संपला आहे. संचारबंदीमुळे जिल्हाभरातील ग्राहक सांगलीला फिरकला नाही. दरवर्षीपेक्षा २५ टक्केही उलाढाल झालेली नाही. नवी आवक नसल्याने दरवाढ झाली आहे.- विजय पाटील, घाऊक व्यापारी, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय