शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बालकांचे हक्क आणि सुरक्षितता जाणीव जागृतीसाठी बाल सुरक्षा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:23 IST

संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता स्वीकारली व त्याच्यावर 190 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशांमध्ये बाल हक्क मंजूर केले आहेत. यावर्षी यास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह बाल सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग आणि युनिसेफ यांच्याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देबालकांचे हक्क आणि सुरक्षितता जाणीव जागृतीसाठी बाल सुरक्षा सप्ताहसांगलीत विविध उपक्रम राबविण्यात येणार

सांगली : संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालहक्क संहिता स्वीकारली व त्याच्यावर 190 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशांमध्ये बाल हक्क मंजूर केले आहेत. यावर्षी यास 30 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह बाल सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग आणि युनिसेफ यांच्याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.बाल सुरक्षा सप्ताह अंतर्गत दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर या सप्ताहामध्ये पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बाल दिनानिमित्त दप्तरविना शाळा, बाल सभेचे आयोजन, मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत मार्गदर्शन, आनंददायी खेळ व छंद स्पर्धा आयोजन, शाळा परिसरामध्ये मुलांना धोक्याच्या ठरतील अशा गोष्टीचा शोध घेणे व त्या दूर करणे, शाळा व्यवस्थापन समितीची सभा, मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत चर्चा, मुलांसाठी रंगोत्सव साजरा करणे, घोषवाक्य तयार करणे, पोस्टर बनवणे, चित्र काढणे अशा विविध स्पर्धा घेणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मुलांच्या घरी भेट देवून त्यांच्या कुटूंबियांना शिक्षणाचे महत्व समजावणे, पालकांकडून मुलांचे हक्कांच्या संरक्षणासाठी मुलांना शिक्षण, आरोग्य, पोषक आहार, यासाठीची व्यवस्था प्रणाली समजावून सांगणे आणि बालविवाह, बालमजूर, विविध प्रकारचे होणारे शोषण इत्यादी अनिष्ठा प्रथा निर्मुलनासाठी पालकांमध्ये जाणीवजागृती करणे, विविध कला गुणांबाबत अभिव्यक्त होण्यासाठी कविता करणे, भाषण, एकांकिका, एकपात्री स्वागत, गायन, नकला, कथा-कथन, नाट्य सादरीकरण, आवडते पुस्तक वाचून स्वत:च्या भाषेत पुस्तकाचा सारांश गोष्ट स्वरूपात व्यक्त करणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करून मुलांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आनंद मेळावा, मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन भरवणे, पालक आणि मुलांचे संयुक्तिक खेळ, पालकांना मुलांच्या हक्क आणि संरक्षण याबाबत जागृत करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

टॅग्स :children's dayबालदिनSangliसांगली