शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

आरटीईनुसार प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर फौजदारी

By admin | Updated: February 23, 2015 23:58 IST

सतीश लोखंडे : विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे मुख्याध्यापकांनी हमीपत्र द्यावे

सांगली : आरटीई कायद्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक खासगी, अनुदानित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांनी एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला पाहिजे. याप्रमाणे प्रवेश दिल्याचे हमीपत्र आठ दिवसात मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करावे. यामध्ये त्रुटी आढळून आल्यास संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिला आहे.खासगी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई कायद्यानुसार २५ टक्के वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला नाही, अशा तक्रारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन लोखंडे यांनी आज (सोमवारी) माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांनी आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत का? हे तपासण्याचे आदेश दिले, यावेळी लोखंडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आरटीई कायद्यानुसार प्रत्येक शाळांनी आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला पाहिजे. तरीही इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत, ही गंभीर बाब असून, असे प्रवेश न देणाऱ्या शाळांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच संस्थेची मान्यताही रद्द करण्यात येणार आहे. म्हणून प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नावासह हमीपत्र आठ दिवसात माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करावे. यामध्ये त्रुटी आढळणाऱ्या शाळांवर आणि मुख्याध्यापकांवर आरटीई कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असेही लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, वकिलांचा सल्ला घेऊन माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना नोटिसा बजाविल्या आहेत. (प्रतिनिधी)मान्यता रद्द होऊ शकतेशाळांनी एकूण प्रवेशाच्या २५ टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिला नसेल, तर संबंधित शाळेची मान्यता रद्दचा अधिकार शासनाला आहे. त्यानुसार त्या शाळांवर कारवाई होईल, असे लोखंडे यांनी सांगितले.