शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

भाजपमध्ये कोणी येण्याची आता आवश्यकता नाही: चंद्रकांत पाटील 

By अविनाश कोळी | Updated: September 19, 2022 20:32 IST

विश्वजित कदमांचा भाजपकडे प्रस्तावच नाही

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी भाजपमध्ये येण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा चुकीची आहे. सध्या भाजपमध्ये कोणी येण्याची फार आवश्यकता नाही, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सांगलीत विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात आमची सत्ता आल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काठावर असणारी मंडळी आता भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत हे चित्र आहे. महाराष्ट्रात सध्या आम्ही क्रमांक एकवर आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांची उरलीसुरली ताकदही संपेल.

विश्वजित कदम यांनी भाजपकडे कोणताही प्रस्ताव अद्याप दिलेला नाही. त्यापूर्वीच माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. कदम यांच्याकडून तसा प्रस्ताव आल्यास जगताप यांचेही मत विचारात घेतले जाईल. कदम यांना घेतानाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचार करून निर्णय घेतला जाईल. ईडीच्या दबावापोटी लोक आमच्याकडे येताहेत, या सर्व विरोधकांच्या अफवा आहेत. त्या स्वायत्त संस्था असून, त्यांच्या कारवाईबाबत कुणीही बोलणे योग्य नाही. तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्यावे.

ठाकरेंची पिछेहाट, पवारांचा प्रभाव संपवणार

एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुतांश आमदार, खासदार आल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची खूप पिछेहाट झाली आहे. काँग्रेसची ताकद संपुष्टात आली आहे. आता बारामतीमधील पवारांचा प्रभाव आम्ही संपवत चाललो आहोत. वर्षभरात त्यांचा राज्यात कोठेही प्रभाव राहणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील