शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपमध्ये कोणी येण्याची आता आवश्यकता नाही: चंद्रकांत पाटील 

By अविनाश कोळी | Updated: September 19, 2022 20:32 IST

विश्वजित कदमांचा भाजपकडे प्रस्तावच नाही

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी भाजपमध्ये येण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा चुकीची आहे. सध्या भाजपमध्ये कोणी येण्याची फार आवश्यकता नाही, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सांगलीत विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात आमची सत्ता आल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काठावर असणारी मंडळी आता भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत हे चित्र आहे. महाराष्ट्रात सध्या आम्ही क्रमांक एकवर आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांची उरलीसुरली ताकदही संपेल.

विश्वजित कदम यांनी भाजपकडे कोणताही प्रस्ताव अद्याप दिलेला नाही. त्यापूर्वीच माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. कदम यांच्याकडून तसा प्रस्ताव आल्यास जगताप यांचेही मत विचारात घेतले जाईल. कदम यांना घेतानाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचार करून निर्णय घेतला जाईल. ईडीच्या दबावापोटी लोक आमच्याकडे येताहेत, या सर्व विरोधकांच्या अफवा आहेत. त्या स्वायत्त संस्था असून, त्यांच्या कारवाईबाबत कुणीही बोलणे योग्य नाही. तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्यावे.

ठाकरेंची पिछेहाट, पवारांचा प्रभाव संपवणार

एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुतांश आमदार, खासदार आल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची खूप पिछेहाट झाली आहे. काँग्रेसची ताकद संपुष्टात आली आहे. आता बारामतीमधील पवारांचा प्रभाव आम्ही संपवत चाललो आहोत. वर्षभरात त्यांचा राज्यात कोठेही प्रभाव राहणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील