शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

भाजपमध्ये कोणी येण्याची आता आवश्यकता नाही: चंद्रकांत पाटील 

By अविनाश कोळी | Updated: September 19, 2022 20:32 IST

विश्वजित कदमांचा भाजपकडे प्रस्तावच नाही

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी भाजपमध्ये येण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा चुकीची आहे. सध्या भाजपमध्ये कोणी येण्याची फार आवश्यकता नाही, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सांगलीत विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात आमची सत्ता आल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काठावर असणारी मंडळी आता भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत हे चित्र आहे. महाराष्ट्रात सध्या आम्ही क्रमांक एकवर आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांची उरलीसुरली ताकदही संपेल.

विश्वजित कदम यांनी भाजपकडे कोणताही प्रस्ताव अद्याप दिलेला नाही. त्यापूर्वीच माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. कदम यांच्याकडून तसा प्रस्ताव आल्यास जगताप यांचेही मत विचारात घेतले जाईल. कदम यांना घेतानाही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचार करून निर्णय घेतला जाईल. ईडीच्या दबावापोटी लोक आमच्याकडे येताहेत, या सर्व विरोधकांच्या अफवा आहेत. त्या स्वायत्त संस्था असून, त्यांच्या कारवाईबाबत कुणीही बोलणे योग्य नाही. तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना त्यांचे काम करू द्यावे.

ठाकरेंची पिछेहाट, पवारांचा प्रभाव संपवणार

एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुतांश आमदार, खासदार आल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची खूप पिछेहाट झाली आहे. काँग्रेसची ताकद संपुष्टात आली आहे. आता बारामतीमधील पवारांचा प्रभाव आम्ही संपवत चाललो आहोत. वर्षभरात त्यांचा राज्यात कोठेही प्रभाव राहणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील