शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

चंद्रकांतदादांनी दिला नवा ‘सहकार’मंत्र

By admin | Updated: April 15, 2015 00:29 IST

सहकारी संस्थांच्या निवडणुका : तत्त्वाच्या राजकारणावर तडजोडींचे वर्चस्व; नेत्यांसमोर सर्व पर्याय खुले

अविनाश कोळी, सांगली : काही दिवसांपूर्वी सहकारी संस्था स्वबळावर लढण्याचे स्पष्ट मत व्यक्त करणारे भाजप नेते, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी सहकाराचा नवा लवचिक मंत्र दिला आहे. स्वबळाची भाषा करतानाच शक्य त्याठिकाणी अन्य पक्षांशीही हातमिळवणी करण्याबाबतचे संकेत त्यांनी सोमवारी सांगलीत दिले. त्यामुळे तत्त्वाच्या राजकारणावर आता तडजोडीच्या राजकारणाने वर्चस्व मिळविल्याचे चित्र भाजपसहित बहुतांश पक्षांमध्ये दिसत आहे. सहकारी संस्थांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना एकदा प्रवेश तरी करावा लागेल. सहकार काय असतो, त्याची कार्यपद्धती काय असते, या बाबी समजून घेणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे शक्य तिथे स्वबळावर व काही ठिकाणी अन्य पक्षीय पॅनेलशी हातमिळवणी करून सहकारी संस्थांमध्ये प्रवेश करावा लागेल, असे मत चंद्रकांतदादांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले. चंद्रकांतदादांचा हा मंत्र अनेकांना धक्का देणाराही ठरला आहे. त्यांच्याच सहकार विभागाने ज्या माजी संचालकांची चौकशी लावून त्यांना जेरीस आणले, त्याच लोकांशी पुन्हा भाजप नेत्यांना निवडणुकीबाबत चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे तत्त्वाचे की तडजोडीचे राजकारण करायचे, या प्रश्नालाही त्यांनी उत्तर देऊन टाकले आहे. त्यांचा हा नवा सहकारमंत्र मात्र जिल्ह्यातील नेत्यांच्या कामी येणार आहे. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे राष्ट्रवादीचे आवाहन भाजपने सकारात्मक पद्धतीने घेतले होते. परंतु निवडणूक लढवायची की राजकीय तडजोड करायची, याबाबत संभ्रमावस्था दिसत होती. चंद्रकांतदादांनी या संभ्रमावस्थेला दूर करीत शक्य तिथे लढण्याचे व शक्य तिथे अन्य पक्षांशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप नेते निश्चिंत झाले आहेत. सहकाराचा नवा मूलमंत्र घेऊन आता भाजप नेते सरसावले आहेत. त्यांनी लगेचच मिरजेत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली. मनाप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत, तर स्वबळावरही आम्ही लढू, असा नारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिल्हा बॅँकेत राजकारण नको आहे. सर्वपक्षीय पॅनेलच्या माध्यमातून बिनविरोध निवडणूक करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सुरुवातीला कॉँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला होता. आता दोन्ही पक्षातील नेते आक्रमक होऊन आपल्या मागण्या पुढे रेटत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला ही ऐक्य एक्स्प्रेस चालविणे तितके सोपे राहिलेले नाही. राष्ट्रवादी लवचिक होणार का? आजवर जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादीने कधी अन्य पक्षांना डोईजड होऊ दिले नाही. महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांची ताकद अन्य पक्षांपेक्षा मोठी असल्याने ते नेहमीच अन्य पक्षांपेक्षा अधिक आग्रही राहात आले आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत आ. जयंत पाटील हे हुकमी एक्का म्हणून काम करणार आहेत. भाजपमधील काही नेते अजूनही जयंतरावांचा शब्द मोडत नाहीत. त्यामुळे हुकमी एक्का राष्ट्रवादीला तारणार, की सत्तेच्या जोरावर भाजप नेतेच राष्ट्रवादीला लवचिक बनविणार, हा चर्चेचा विषय आहे.