शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले, ४५७३ क्युसेक विसर्ग सुरू

By श्रीनिवास नागे | Updated: September 14, 2022 18:52 IST

गतवर्षी २१ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरले होते.

वारणावती/सांगली : चांदोलीत पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून ४ हजार ५७३ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे. धरणात आज, बुधवारी ३४.२६ टीएमसी पाणीसाठा झाला.सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात पाण्याची आवक होत असते. ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरते. गतवर्षी २१ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरले होते.यंदाही पावसाचे प्रमाण कमी अधिक असले तरीही आठ दिवस अगोदरच धरण पूर्ण क्षमतेने भरले. पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू ठेवावा लागतो. त्यानुसार मंगळवारी जलविद्युत केंद्राकडून १५७३ क्युसेक व वक्राकार दरवाजातून ३ हजार क्युसेक असा एकूण ४ हजार ५७३ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू केला आहे.चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ ते बुधवार सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत ३७ मिलीमीटर व बुधवारी चारपर्यंत केवळ ७ मिलीमीटर अशा एकूण २६२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून २९१६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीपातळी ६२६.७५ मीटर असून पाणीसाठा ३४.२६ टीएमसी आहे. त्याची टक्केवारी ९९.५८ अशी आहे. बुधवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.

टॅग्स :SangliसांगलीDamधरण