शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

काँग्रेससमोर ‘नांदेड’च्या पुनरावृत्तीचे आव्हान--महापालिका :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:10 IST

सांगली : वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकी काँग्रेसचे एकेक बुरूज ढासळले.

ठळक मुद्देखमक्या नेतृत्वाचा अभाव; गटबाजीने पक्षाला पोखरले; भाजप, राष्ट्रवादीची तयारी या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे राहणार, हा प्रश्न आहे.

शीतल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकी काँग्रेसचे एकेक बुरूज ढासळले. जिल्ह्यात एकमेव महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप, राष्ट्रवादीने कंबर कसली असताना, काँग्रेसकडे मात्र खमक्या नेतृत्वाचा अभाव दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला भुईसपाट केले. त्याचीच पुनरावृत्ती सांगलीत करण्याचे आव्हान येथील विद्यमान काँग्रेस नेतृत्वासमोर असेल.

सांगली जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला, हे समीकरण आता इतिहासजमा झाले आहे. खासदार, आमदारकीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत काँग्रेसचा एकछत्री अंमल होता. पण काळाच्या ओघात जिल्ह्यावरील काँग्रेसचे वर्चस्व कमी झाले. सध्या केवळ पतंगराव कदम यांच्यारूपाने केवळ एक आमदार काँग्रेसकडे आहे. लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसला जिल्ह्यात घरघर लागली. वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांना या घराण्याच्याच तालमीत तयार झालेल्या संजयकाका पाटील यांनी लोकसभेला पराभवाचा दणका दिला. त्यानंतर सुरू झालेली पडझड अद्यापही थांबलेली नाही.

विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच जिल्ह्यात देदीप्यमान यश मिळविले. त्यानंतर झालेल्या नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा राहिला. जिल्हा बँक, बाजार समिती अशा सहकारी संस्थांतही भाजप सत्तेचा भागीदार बनला.सध्या काँग्रेसकडे सांगण्यासारखे केवळ एकच सत्तास्थान शिल्लक आहे, ते म्हणजे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका. चार वर्षापूर्वी सांगलीकरांनी मदन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता सोपविली. पण आता या सत्तेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. काँग्रेसमध्ये मोजता न येण्याइतपत गट-तट झाले आहेत. विशेषत: मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिका क्षेत्रातील काँग्रेस पोरकी झाली असून खमक्या नेतृत्वाअभावी पक्षाचे अवसानच गळाले आहे. मदन पाटील यांना विधानसभेला पराभव स्वीकारावा लागला होता, तरी त्यांचा दबदबा कायम होता. विशेषत: मिरज तालुक्यात त्यांच्या शब्दाला मान होता. महापालिकेच्या राजकारणात तर त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता. पण त्यांच्या निधनानंतर महापालिकेतील सत्ताधाºयांचा ताळतंत्रच सुटला आहे. प्रत्येकजण स्वत: नेता बनून समोर येऊ लागला आहे. त्यातून गटबाजी, संघर्ष उफाळत आहे. भ्रष्टाचार, बेकायदेशीर कारभाराच्या आरोपाचा कलंक दिवसेंदिवस गडद होत चालला आहे. पुढीलवर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे राहणार, हा प्रश्न आहे.

मदन पाटील यांच्या पश्चात जयश्रीताई पाटील यांनी नेतृत्वाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न चालविला आहे, पण त्यांनाही मर्यादा पडत आहेत. वसंतदादांचे नातू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी महापालिकेच्या राजकारणापासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे. दुसरे नातू विशाल पाटील यांनी महापालिकेत स्वत:चा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून मदन पाटील गटाशीच त्यांच्या गटाचा दररोज संघर्ष सुरू आहे. त्यातच विशाल पाटील यांनी वसंतदादा साखर कारखाना खासगी कंपनीकडे चालवण्यास देऊन विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे. माजी मंत्री आ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना त्यांच्या कामाच्या व्यापातून पालिकेत अपेक्षित लक्ष देता येत नाही. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काही प्रमाणात संघटन सुरू केले आहे, मात्र मदन पाटील आणि विशाल पाटील गट त्यांच्याशी जुळवून घेताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेतील काँग्रेस निराधार झाल्याचे दिसून येते.

आता जिल्ह्यातील काँग्रेसच्या या एकमेव सत्तास्थानालाही धक्का देण्याची तयारी भाजपने चालविली आहे. आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, मकरंद देशपांडे अशी मोठी फौज भाजपकडे आहे. त्याशिवाय पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील या बड्या नेत्यांची मदतही होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी नवरात्र व गणेशोत्सवात विविध मंडळांना भेटी दिल्या. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सभासद नोंदणीतून घरा-घरापर्यंत जाण्याचा प्रयोग राष्ट्रवादीकडून सुरू आहे. या घडामोडी पाहता, निवडणूकपूर्व तयारीत काँग्रेस कोठेच दिसत नाही.

नांदेड महापालिकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी एकहाती सत्ता आणली. या विजयाने सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. नांदेडप्रमाणे सांगलीतही पुनरावृत्ती करू, असा संदेश सोशल मीडियावरून दिला जात आहे. पण ते शक्य आहे का, याचे चिंतन करण्याची वेळ सांगलीतील काँग्रेसवर आली आहे.मिरजकर ठरणार : किंगमेकरमहापालिका निवडणुकीत वारे कोणत्याही दिशेने वाहत असले तरी, आजपर्यंत मिरजकरच किंगमेकर ठरले आहेत. मिरजेतून जादा जागा जिंकणारा पक्षच पालिकेत सत्तेवर विराजमान झाला आहे. किशोर जामदार, सुरेश आवटी, इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान अशी दिग्गज मंडळी सत्तेचा सारीपाट मांडतात. गतवेळी बागवान वगळता सर्वजण काँग्रेसच्या पाठीशी होते, तर २००८ च्या निवडणुकीत जामदार वगळता सर्व मंडळी विकास महाआघाडीत होती. सध्या आवटी व नायकवडी काँग्रेसवर नाराज आहे.