शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सुधीर गाडगीळांसमोर विकासाचे आव्हान

By admin | Updated: October 23, 2014 00:04 IST

व्यापारीबहुल भागात आघाडी

शीतल पाटील - सांगली विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात पिछाडीवर असलेल्या भाजपच्या सुधीर गाडगीळ यांना सांगली व कुपवाड या महापालिका हद्दीतील दोन शहरांनी तारले. आता या दोन शहरातील समस्यांचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. प्रामुख्याने एलबीटी रद्द करण्याबरोबरच शहरातील रस्ते, स्वच्छ पाणी, शेरीनाल्याचे भिजत घोंगडे, मूलभूत नागरी सुविधांसाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. या प्रश्नांना ते कितपत न्याय देतात, यावरच त्यांचे राजकीय कर्तृत्व सिद्ध होणार आहे. राजकीय पिंड नसलेल्या सुधीर गाडगीळ यांच्या पारड्यात सांगलीच्या जनतेने आपले वजन टाकत, पहिल्याच प्रयत्नात त्यांना आमदार केले. स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक चारित्र्याचा त्यांना मोठा फायदा झाला. तरीही निवडणुकीच्या रणांगणात त्यांच्यावरही आरोप-प्रत्यारोप झालेच. वातानुकूलित कार्यालयात बसून ते काम करणार का? त्यांना झोपडपट्टी, शेरीनाला माहिती आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. या सर्व आरोपांना गाडगीळ यांनी निवडणूक जाहीरनाम्यातून प्रत्युत्तर दिले. ‘माझा वचननामा’ या जाहीरनाम्यातून त्यांनी एलबीटीपासून सांगली स्मार्ट सिटी करण्यापर्यंत अनेक आश्वासने जनतेला दिली आहेत. शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. शहरात मोठे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत आहे. शेरीनाल्याच्या पूर्ततेसाठी आणखी १४ कोटींची गरज आहे. झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न अद्यापही पूर्ण झालेले नाही. घरकुल योजना रखडली आहे. गुंठेवारी भागाचा विकास खुंटला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने विकासाला मर्यादा येत आहेत. हे सारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गाडगीळ यांना परिश्रम घ्यावे लागतील. कृष्णा नदीच्या दूषित पाण्यापासून सांगलीकरांची सुटका करण्यासाठी वारणा उद्भव पाणी योजनेला गती द्यावी लागणार आहे. त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून निधी खेचून आणावा लागेल. शहराबरोबरच ग्रामीण भागातही भाजपला रुजविण्याची जबाबदारी गाडगीळ यांच्यावर आहे. या आव्हानांना ते कसे सामोरे जातात, त्यावरच भवितव्य अवलंबून आहे. व्यापारीबहुल भागात आघाडीआता राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने गाडगीळांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सांगलीतील बुथनिहाय मतांची आकडेवारी पाहिल्यास, व्यापारीबहुल भागात गाडगीळांना मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामागे एलबीटी हे प्रमुख कारण आहे. भाजपने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय एलबीटी रद्द झाल्यास महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य व केंद्राकडून निधी खेचून आणावा लागेल.