शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

खासदारांच्या कारखान्यातील ऊस बिलांसाठी चड्डी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांच्या थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांच्या थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी मोर्चा काढला. याची दखल घेत कारखाना व्यवस्थापनाने सात कोटींचे धनादेश आंदोलकांना दिले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. ‘ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘घामाचे दाम मिळालेच पाहिजेत’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. बनियन आणि चड्डीवर मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सभेत खराडे म्हणाले, ऊस बिलांसाठी चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. बिलांअभावी शेतकरी हैराण आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहेत. खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून बिले तातडीने मिळावीत.

आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. स्वत: लक्ष घालून कार्यवाहीची विनंती केली.

मोर्चात महेश जगताप, भरत चौगुले, राजेंद्र माने, श्रीधर उदगावे, शांतीनाथ लिंबिकाई, सुरेश वसगडे, तानाजी धनवडे, गोरख महाडिक, सचिन महाडिक, अख्तर संदे, विनायक पवार, पोपट उपाध्ये, भय्या पाटील, सुधाकर पाटील, शिवाजी पाटील आदी सहभागी झाले.

चौकट

सात कोटींचे धनादेश दिले

यादरम्यान, कारखान्याचे व्यवस्थापक आर.डी. पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. संजय बेले, सर्जेराव पवार, अजित हळिंगळे, गुलाबराव यादव, भुजंग पाटील, अशोक खाडे, दामाजी डुबल, संदीप शिरोटे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार सात कोटी रुपयांचे ११ सप्टेंबरचे धनादेश दिले. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन व उपोषण स्थगित करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना आर.डी. पाटील, खराडे, संदीप राजोबा यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.