शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या कारखान्यातील ऊस बिलांसाठी चड्डी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांच्या थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांच्या थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी मोर्चा काढला. याची दखल घेत कारखाना व्यवस्थापनाने सात कोटींचे धनादेश आंदोलकांना दिले.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. ‘ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘घामाचे दाम मिळालेच पाहिजेत’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. बनियन आणि चड्डीवर मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सभेत खराडे म्हणाले, ऊस बिलांसाठी चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. बिलांअभावी शेतकरी हैराण आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहेत. खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून बिले तातडीने मिळावीत.

आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. स्वत: लक्ष घालून कार्यवाहीची विनंती केली.

मोर्चात महेश जगताप, भरत चौगुले, राजेंद्र माने, श्रीधर उदगावे, शांतीनाथ लिंबिकाई, सुरेश वसगडे, तानाजी धनवडे, गोरख महाडिक, सचिन महाडिक, अख्तर संदे, विनायक पवार, पोपट उपाध्ये, भय्या पाटील, सुधाकर पाटील, शिवाजी पाटील आदी सहभागी झाले.

चौकट

सात कोटींचे धनादेश दिले

यादरम्यान, कारखान्याचे व्यवस्थापक आर.डी. पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. संजय बेले, सर्जेराव पवार, अजित हळिंगळे, गुलाबराव यादव, भुजंग पाटील, अशोक खाडे, दामाजी डुबल, संदीप शिरोटे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार सात कोटी रुपयांचे ११ सप्टेंबरचे धनादेश दिले. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन व उपोषण स्थगित करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना आर.डी. पाटील, खराडे, संदीप राजोबा यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.