शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

कडधान्यांच्या उत्पादनात ६० टक्के घट

By admin | Updated: September 6, 2015 23:13 IST

दुष्काळाचा फटका : अन्य पिकांवरही परिणाम शक्य; वर्षभर दर तेजीतच राहण्याची शक्यता

अशोक डोंबाळे - सांगली  पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील उडीद, मूग, तुरीच्या उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांनी घट होणार आहे. याच परिस्थितीचा खरिपाच्या इतर पिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कडधान्य उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील पिके पूर्णत: वाळून गेली आहेत. परिणामी वर्षभरात कडधान्यांचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर तब्बल महिनाभराच्या खंडानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी भागातील खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. रिमझिम, तुरळक व हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून होत राहिला. परंतु त्याचा उत्पादनासाठी फारसा उपयोग झाला नाही. खरिपातील बहुतांशी पिके सध्या फुलोऱ्यात अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. पिकांची ही अवस्था महत्त्वपूर्ण समजली जाते. चार-पाच दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास दाणे भरले जाणार नाहीत अथवा दाणे भरल्यास ते बारीक राहतील. त्याचा परिणाम वजनावर पर्यायाने उत्पादनावर होणार आहे. गतवर्षी उडीद-मुगाचे हेक्टरी उत्पादनाचे उद्दिष्ट ८२७ किलो असताना प्रत्यक्षात ते ४१२ किलो झाले होते. यंदा उद्दिष्ट ८२७ किलो अपेक्षित आहे. परंतु, ते सुमारे ४५० ते ५०० किलो एवढेच होईल, असे मत सूत्रांनी व्यक्त केले. सलग तीन वर्षे जिल्ह्यातील कडधान्याच्या उत्पादनात घट होत चालल्याचे कृषी विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यंदा तृणधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट प्रती हेक्टरी २५६०, गळीत धान्याचे १५०० किलो अपेक्षित आहे. मात्र ते साध्य होणार नाही. पावसाने पीकवाढीच्या व आता दाणे पक्वतेच्या टप्प्यावर ओढ दिल्याने उत्पादनाची सरासरीही गाठणे कठीण होणार असून, शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका सोसावा लागेल, असा अंदाज आहे.कृषी विभागाकडून पीकनिहाय उत्पादनात होणाऱ्या घटीचा आढावा घेतला जात आहे. अर्थात येत्या चार-पाच दिवसात पाऊस झाल्यास घट होण्याच्या प्रमाणात घट होईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील कडधान्यांच्या पेरणीत तीन वर्षात झालेली घट (क्षेत्र हेक्टरमध्ये)