शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

जलशक्ती अभियानात कवठेमहांकाळ तालुक्यातील कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 4:59 PM

केंद्र शासनामार्फत पाण्याच्या दुर्भिक्ष असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने जलशक्ती अभियान केंद्र शासनाच्या संलग्नतेने राबविण्यात येत आहे. हे अभियान 2 टप्प्यामध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा 1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 व दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे कवठेमहांकाळ तालुक्यात जलशक्ती अभियान कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी

सांगली : केंद्र शासनामार्फत पाण्याच्या दुर्भिक्ष असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने जलशक्ती अभियान केंद्र शासनाच्या संलग्नतेने राबविण्यात येत आहे. हे अभियान 2 टप्प्यामध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा 1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 व दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

या योजनेसाठी सांगली जिल्ह्यातून कवठेमहांकाळ तालुक्याची निवड झाली असून या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांनी दिली.जलशक्ती अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये (1 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 ) मध्ये चालू असलेल्या कामांची तपासणी करणेसाठी केंद्र शासनाकडील सह सचिव, उपसचिव, व तांत्रिक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून पथक हे चालू असलेल्या कामांची दर 15 दिवसांनी 3 वेळा पहाणी करणार आहेत.

त्या अनुषंगाने व्दितीय तपासणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे उपसचिव राजू वैद्य व जलशक्ती अभियान मंत्रालय तांत्रिक अधिकारी हनमंतआप्पा हे दि.28/08/2019 ते 31/08/2019 पर्यंत दौऱ्यावर आले होते. त्यामध्ये त्यांनी तालुकास्‍तरीय सर्व अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन सांगली जिल्ह्यातील आराखड्याबाबतची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना यंत्रणेला दिल्या. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांनी दिली.महिला बचतगट यांची बैठक घेवून यामध्ये सहभागी होण्‍याबाबत आवाहन केले. या अभियानाअंतर्गत चालू असलेल्या कामांची तपासणी कुकटोळी, अलकुड एम, हरोली, आगळगाव, रायवाडी, विठुरायाचीवाडी, खरसिंग, बोरगाव, मळणगाव, नागज या ठिकाणी शोषखड्डा, वृक्षलागवड, छतावर पडणारे पावसाच्या पाण्याचा संचय, पाझर तलाव, समतल चर इत्यादी कामांची पाहणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.

तसेच अलकुड एम मध्‍ये कृषी विज्ञान केंद्र तर्फे आयोजित केलेल्‍या मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त शेतक-यांना जलशक्‍ती कामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर योजनेमध्ये सांगली जिल्हा हा देशामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्याबाबत सर्व विभाग/ यंत्रणानी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या.या अभियानामध्ये सिमेंट बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, वृक्ष लागवड, सलग समतल चर, सिमेंट बंधारे दुरुस्ती, नवीन शेततळी बांधणे, शेततळी दुरुस्ती, नाला, ओढ्यामधील गाळ काढणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, शोष खड्डे, विहीर पुनर्भरण, बोअर वेल पुनर्भरण, माती नाला बांध इत्यादी प्रकारची कामे घेण्यात येणार आहेत व सदर अभियानामध्ये तालुका कृषी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, नगरपालिका, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जीएसडीए इत्यादी विभागांचा समावेश असून या यंत्रणामार्फत कामे चालू आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी