शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागाची इमारत धूळ खात उद्योजकांत नाराजी

By admin | Updated: December 9, 2014 00:27 IST

अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी, महापालिकेचे दुर्लक्ष

महालिंग सलगर - कुपवाड मिरज औद्योगिक वसाहतीमधील नगरपरिषदेपासून महापालिकेपर्यंतची स्थित्यंतरे अनुभवलेली अग्निशमन केंद्राची इमारत सध्या महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडून आहे़ यामुळे मिरजेतील उद्योजकांमध्ये नाराजी पसरली असून, याठिकाणी महापालिकेचे अग्निशमन केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी उद्योजकांमधून होऊ लागली आहे़ मिरज औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७१ मध्ये झाली़ त्यानंतर १९७३ मध्ये प्रत्यक्षपणे या एमआयडीसीचे काम सुरू झाले़ या एमआयडीसीमध्ये टेक्स्टाईल, इंजिनिअरिंग, कॅटल फीड, स्टार्च, फौंड्रीसह इतर अनेक प्रकारचे उद्योग सुरू झाले़ त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने या सुरू झालेल्या उद्योगासाठी अग्निशामन केंद्र सुरू केले होते़ अग्निशमन केंद्रामध्ये एक अग्निशामक गाडी आणि कर्मचारी वर्ग दिला होता़ ही व्यवस्था प्रारंभी औद्योगिक विकास महामंडळाने चांगल्याप्रकारे सुरू ठेवली होती़ मात्र, हे औद्योगिक क्षेत्र मिरज नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाकडून १९८३ मध्ये मिरज नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आले़ थोड्या कालावधीपर्यंत हे अग्निशमन केंद्र सुरू ठेवले होते़ परंतु, काही दिवसानंतर हे केंद्र बंद करण्यात आले़ त्यातील अग्निशमन केंद्राची गाडी महापालिकेने मिरज मार्केटला नेली़ तर कर्मचारीवर्ग एमआयडीसीकडे वर्ग केला़ त्यानंतर नगरपरिषदेची महापालिका झाली़ मिरजेतील उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या़ परंतु, महापालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले़ नगरपरिषद व महापालिकेने या अग्निशमन इमारतीकडे आजपर्यंत ढुंकूनही पाहिले नाही़ लाखो रूपयांची मालमत्ता आता दुर्लक्षामुळे धूळ खात पडून आहे़ या ठिकाणी अग्निशमन केंद्राच्या इमारतीसह कर्मचाऱ्यांच्या घरांचीही दुरवस्था झाली आहे़ इमारतीमध्ये अवैध धंदे सुरू असतात़ ही इमारत गाढवे व मोकाट कुत्र्यांचे आश्रयस्थान बनले आहे़ अग्निशामन केंद्राची दुरवस्था थांबवून या ठिकाणी महापालिकेने त्वरित केंद्र सुरू करण्याची मागणी मिरज एमआयडीसीतील उद्योजकांतून व्यक्त होऊ लागली आहे़ उद्योजकांच्या मागणीला टोपली... सांगली, मिरज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग मित्रच्या बैठकीत या अग्निशमन केंद्राच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित केला़ परंतु, महापालिकेने केवळ उद्योजकांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे काम केले आहे़ तसेच उद्योजकांच्या मागणीला केवळ केराची टोपली दाखविली आहे़ उद्योग मित्रमध्ये वरिष्ठ अधिकारी येत नसल्यानेच हा प्रश्न प्रलंबितच राहिला असल्याचे अनेक उद्योजकांनी सांगितले आहे़