शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ३४ कोटींवर

By admin | Updated: April 20, 2017 22:56 IST

जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ३४ कोटींवर

सांगली : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकामध्ये नावीन्यपूर्ण योजनांवर फोकस करण्यात आला. स्वीय निधीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बीओटी तत्त्वावर गाळे बांधणे, प्लॅस्टिक व डासमुक्त गावे, मुक्त संचार गोठ्यासाठी अनुदान, डिजिटल शाळा, बोगस डॉक्टरची माहिती देणाऱ्यांना एक हजाराचे बक्षीस देण्याची तरतूद केली आहे. यावर्षीचे मूळ ३४ कोटींचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी सभेपुढे अवलोकनार्थ मांडले.डॉ. भोसले यांनी २०१६-१७ चे अंतिम सुधारित आणि २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षातील मूळ अंदाजपत्रक अवलोकनार्थ ठेवले. यावेळी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरुण राजमाने, तम्मनगौडा रवी, ब्रह्मदेव पडळकर, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये आरंभीची शिल्लक १२ कोटी ६७ लाख, महसुली जमा १६ कोटी ६५ लाख रुपये याशिवाय भांडवली ४ कोटी ६७ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील मूळ अंदाजपत्रक ३४ कोटी एक लाख १४ हजार १३० रुपयांचे झाले आहे. तत्कालीन सभागृहाने शंभर टक्के निधी खर्च केला असता तर, नव्या सभागृहासाठी अवघे २२ कोटी रुपये शिल्लक राहिले असते. विकासकामांसह योजनांवर किती खर्च करायचा, असा प्रश्न निर्माण होण्याची साशंकता होती. मागील वर्षातील १२ कोटी ६७ लाख रुपये शिल्लक राहिल्याने नव्या सभागृहाच्या स्वीय निधीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. चालू अंदाजपत्रकात नावीन्यपूर्ण योजनांवर भर देण्यात आला. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी बांधा, वापरा व हस्तांतरित करण्याच्या तत्त्वावर रिकाम्या जागांवर गाळे बांधले जाणार आहेत. त्यासाठी समिती नियुक्त केली जाणार असून, महिन्यात अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अपंग कल्याण, समाजकल्याण आणि महिला बालकल्याण विभागासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी प्लॅस्टिक व डासमुक्त गाव अभियान राबविले जाणार आहे. स्वच्छ शाळांतर्गत शाळेत हात धुण्याची मोहीम, डिजिटल शाळा उपक्रम राबविला जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत समावेश नसलेल्या गावात पाझर तलाव बांधले जातील. बोगस डॉक्टरांची माहिती देणाऱ्या आशा वर्कर्सना एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. टंचाईव्यतिरिक्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतीमालासाठी गोदाम तसेच मुक्त संचार गोठ्यासाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)