शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

नव्या यांत्रिक बोटीपासून ब्रह्मनाळ वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 14:28 IST

आता गावगाडा पूर्ववत होताच सारी आश्वासने महापुराच्या पाण्यासारखी विरुन गेलीत. गावकºयांनीही झाले-गेले विसरुन स्वत:ला दररोजच्या रामरगाड्याला जुंपून घेतलेय. बळींच्या कुटुंबीयांच्या जखमा मात्र भळभळत्याच आहेत.

ठळक मुद्देपण कोणतीही कार्यवाही न होता तो फाईलबंद झाला. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनीही दोन बोटींचे आश्वासन दिले होते, त्याचीही पूर्तता अद्याप नाही

सांगली : अॉगस्टमधील प्रलंयकारी महापुरात सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे घडलेल्या दुर्घटनेत १७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. कृष्णाकाठाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेस तीन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप येथील गावकऱ्यांना नवीन बोट मिळालेली नाही. ग्रामस्थांना शंभर लाईफ जॅकेट्स व नवी यांत्रिक बोट हवी आहे, यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे, पण महापुराबरोबर येथील दुर्घटनेचेही गांभीर्य वाहून गेल्याने शासकीय यंत्रणेसह सर्वच स्तरांवर याबाबत उदासिनता दिसून येत आहे.

आॅगस्ट महिन्यात कृष्णा, वारणा व पंचगंगेच्या महापुराने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र विळख्यात घेतला. ८ आॅगस्टला संपूर्ण महाराष्ट्राला हादरवत महापुराने सतराजणांचे प्राण घेतले. होडी उलटून जलसमाधी मिळाली. काळीज हेलावणाºया दुर्घटनेनंतर सहानुभूतीचा महापूर आला. अनेकांनी अनेकप्रकारे हात दिले. आश्वासनेही दिली. वंचित आघाडीने गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केले. आता गावगाडा पूर्ववत होताच सारी आश्वासने महापुराच्या पाण्यासारखी विरुन गेलीत. गावकºयांनीही झाले-गेले विसरुन स्वत:ला दररोजच्या रामरगाड्याला जुंपून घेतलेय. बळींच्या कुटुंबीयांच्या जखमा मात्र भळभळत्याच आहेत.

दुर्घटनाग्रस्त बोट बेवारस अवस्थेत गावाशेजारी पडून आहे. दुर्घटनेवेळी बंद पडलेल्या मोटारीच्या दुरुस्तीकडेही कोणाचे लक्ष नाही. एक वल्हवण्याची होडी आहे, पण तिच्या वापराचे धारिष्ट्य ग्रामस्थांत सध्या तरी नाही. पूरस्थिती वगळता ग्रामस्थांना होडी अथवा बोटीचा वापर दररोज करावा लागत नाही. शेतक-यांनी कसबे डिग्रज, नांद्रे भागात शेतजमिनी केल्यात. तिकडे जाण्यासाठी नदी ओलांडावी लागते. होडी नसल्याने काहिलीचा वापर करावा लागतो. शासनाने नवी होडी दिल्यास काहिलीचा जीवघेणा प्रवास टळेल, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत शंभर लाईफ जॅकेट्स आणि दोन नव्या यांत्रिकी बोटींचा ठराव ग्रामस्थांनी केला, तो जिल्हा प्रशासनाला पाठवला. पण कोणतीही कार्यवाही न होता तो फाईलबंद झाला. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनीही दोन बोटींचे आश्वासन दिले होते, त्याचीही पूर्तता अद्याप नाही

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीboat clubबोट क्लब