शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेसच्या मराठा नेत्यांनाच आरक्षण द्यायचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

सांगली : इतकी वर्षे शरद पवार केंद्रात मंत्री होते, त्यावेळी त्यांनी घटनादुरुस्ती करून आरक्षण का दिले नाही? दोन्ही काँग्रेसमधील ...

सांगली : इतकी वर्षे शरद पवार केंद्रात मंत्री होते, त्यावेळी त्यांनी घटनादुरुस्ती करून आरक्षण का दिले नाही? दोन्ही काँग्रेसमधील मराठा सरदार नेत्यांनाच हे आरक्षण नको आहे, अशी टीका माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केली.

खोत म्हणाले की, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार पळपुटेपणा करत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांनाच आरक्षण नको आहे. तरुणांची माथी भडकावून सत्तेच्या पोळ्या भाजण्याचा उद्योग या नेत्यांनी दीर्घकाळ चालवला आहे. घटनादुरुस्ती आवश्‍यक होती, असे त्यांचे मत असेल तर सत्तेच्या १५ वर्षांत ते का केले नाही? प्रत्येक समाजाला राजकारणासाठी बळी देण्याचे धोरण राबविण्यात आले. आता हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आरक्षणात विघ्न आणत आहेत. घटनादुरुस्ती करून आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, हा शोध शरद पवार यांना कधी लागला. राज्य मागासवर्गीय आयोगावर नेमलेले सदस्य कोण आहेत आणि त्यांची मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिका काय आहे, हे एकदा जाहीर करावे.

बैलगाडी शर्यतबंदीबाबत खोत म्हणाले की, राज्य सरकार याबाबत काहीच हालचाल करत नाही. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ३१ डिसेंबर २०२० रोजी एक पत्र पाठवले, ते मला ऑगस्ट २०२१ ला मिळाले. सरकारचा कारभार किती भोंगळ आहे, याचे उदाहरण आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात या विषयाच्या खटल्यात चांगले वकील देऊन शर्यतबंदी उठवली पाहिजे. अन्यथा, खिलार जात नष्ट होईल. आम्ही ते बघत बसणार नाही, बैलगाडी मालकांसह रस्त्यावर उतरून लढा उभा करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.