शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

पोषण आहार उधारीवर, तालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:32 IST

जत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजना उधारीवर चालत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिने उलटून गेले तरीही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा संपूर्ण खर्च शाळेच्या मुख्याध्यापकांना करावा लागत आहे, तर बचत गटातील महिला उधार उसनवारीवर किराणा दुकानातून साहित्य आणून आहार वाटप करत आहेत.

ठळक मुद्देपोषण आहार उधारीवरतालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत

जयवंत आदाटे जत : जत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजना उधारीवर चालत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिने उलटून गेले तरीही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा संपूर्ण खर्च शाळेच्या मुख्याध्यापकांना करावा लागत आहे, तर बचत गटातील महिला उधार उसनवारीवर किराणा दुकानातून साहित्य आणून आहार वाटप करत आहेत.राज्याच्या शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त गावातील शाळांमधील वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी शाळेत नियमितपणे उपस्थित राहत नाहीत.त्यामुळे या नियमात बदल करून, शाळा सुरू झाल्यानंतर नियमित आहारास जोडून आठवड्यातून तीन दिवस पूरक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त गावातील वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध, फळे व अंडी असा पूरक आहार देण्यात येत आहे. यासाठी प्रतिदिन एका विद्यार्थ्यासाठी पाच रुपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे.शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी या योजनेचे अनुदान अद्याप दिले गेले नाही. त्यामुळे या संपूर्ण योजनेचा भार शाळेतील मुख्याध्यापकांच्या खिशावर पडत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. योजना राबवली तर आर्थिक अडचण आणि नाही राबवली तर शासकीय अधिकाऱ्यांची दमदाटी अशा दुहेरी संकटात मुख्याध्यापक सापडले आहेत.बचत गटाला चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही, पूरक आहार योजना काही ठिकाणी बचत गटाकडून, तर काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडून चालवली जात आहे. दोन महिन्यांपासून पूरक आहार योजनेचे मानधन मिळाले नाही, मार्च २०१९ पासून शालेय पोषण आहार शिजवण्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना उधार उसनवारीवर साहित्य आणून आहार शिजवून त्याचे वाटप करावे लागत आहे. जत तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या मराठी, कन्नड व उर्दू माध्यमातील ४४३ शाळा असून, तेथे एक हजार दोनशे शिक्षक कार्यरत आहेत.

टॅग्स :SchoolशाळाSangliसांगली