शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पोषण आहार उधारीवर, तालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:32 IST

जत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजना उधारीवर चालत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिने उलटून गेले तरीही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा संपूर्ण खर्च शाळेच्या मुख्याध्यापकांना करावा लागत आहे, तर बचत गटातील महिला उधार उसनवारीवर किराणा दुकानातून साहित्य आणून आहार वाटप करत आहेत.

ठळक मुद्देपोषण आहार उधारीवरतालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत

जयवंत आदाटे जत : जत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजना उधारीवर चालत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिने उलटून गेले तरीही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा संपूर्ण खर्च शाळेच्या मुख्याध्यापकांना करावा लागत आहे, तर बचत गटातील महिला उधार उसनवारीवर किराणा दुकानातून साहित्य आणून आहार वाटप करत आहेत.राज्याच्या शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त गावातील शाळांमधील वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी शाळेत नियमितपणे उपस्थित राहत नाहीत.त्यामुळे या नियमात बदल करून, शाळा सुरू झाल्यानंतर नियमित आहारास जोडून आठवड्यातून तीन दिवस पूरक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त गावातील वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध, फळे व अंडी असा पूरक आहार देण्यात येत आहे. यासाठी प्रतिदिन एका विद्यार्थ्यासाठी पाच रुपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे.शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी या योजनेचे अनुदान अद्याप दिले गेले नाही. त्यामुळे या संपूर्ण योजनेचा भार शाळेतील मुख्याध्यापकांच्या खिशावर पडत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. योजना राबवली तर आर्थिक अडचण आणि नाही राबवली तर शासकीय अधिकाऱ्यांची दमदाटी अशा दुहेरी संकटात मुख्याध्यापक सापडले आहेत.बचत गटाला चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही, पूरक आहार योजना काही ठिकाणी बचत गटाकडून, तर काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडून चालवली जात आहे. दोन महिन्यांपासून पूरक आहार योजनेचे मानधन मिळाले नाही, मार्च २०१९ पासून शालेय पोषण आहार शिजवण्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना उधार उसनवारीवर साहित्य आणून आहार शिजवून त्याचे वाटप करावे लागत आहे. जत तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या मराठी, कन्नड व उर्दू माध्यमातील ४४३ शाळा असून, तेथे एक हजार दोनशे शिक्षक कार्यरत आहेत.

टॅग्स :SchoolशाळाSangliसांगली