शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शतज्वालांनी जळणारी एक धगधगती मशाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

ज्यांच्या जीवन प्रवासाला पावलागणिक आलेल्या जीवघेण्या प्रसंगांना, नि:स्वार्थी देशभक्तीच्या कार्याला, समाजोपयोगी अनेक चळवळींच्या अफाट कार्याला, मर्यादित शब्दांनी बांधणे कठीण ...

ज्यांच्या जीवन प्रवासाला पावलागणिक आलेल्या जीवघेण्या प्रसंगांना, नि:स्वार्थी देशभक्तीच्या कार्याला, समाजोपयोगी अनेक चळवळींच्या अफाट कार्याला, मर्यादित शब्दांनी बांधणे कठीण आहे, असे थोर क्रांतिवीर परमपूज्य नागनाथअण्णा यांची आज ९९ वी जयंती. त्यानिमित्ताने...

साधेपणा, निर्मळ नीतीमत्ता, पल्लेदार दूरदष्टी, जबरदस्त आत्मविश्वास, मानवतावादी विचार, धाडसी सावधपण, भ्रष्टाचार व अंधश्रध्दा यविषयीची चीड, भाेगवादीपणाचा तिरस्कार, भेदक तीक्ष्ण नजर, तत्वनिष्ठा ही क्रांतिवीर आण्णांना निसर्गाकडून मिळालेली मोठी देणगी होती. अण्णांचा जन्म १५ जुलै १९२२चा. त्यांना ८९ वर्षे ८ महिने ७ दिवस इतके दीर्घ आयुष्य लाभले. वयाच्या १८ वर्षापर्यंत अण्णा त्यांच्या स्वत:च्या घरचे सदस्य होते. त्यानंतर जवळजवळ ७० वर्षे ते घराच्या बाहेरच राहिले. १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७पर्यंत ५ वर्षे अण्णा देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथकपणे लढले. या काळात त्यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटीश, भांडवलदार, सावकार, गावगुंड व घरभेदी यांना हतबल केले, दुष्ट शक्तींचा पुरता बिमोड केला. मोठ्या हिमतीने व धाडसाने त्यांनी गोव्यावरुन हत्यारे आणली, कागल तालुक्यातील कसबा सांगाव पोलीस ठाण्यामधून पोलिसांच्या बंदुका पळवल्या, पे ट्रेन लुटली आणि साडेपाच लाख रुपयांचा धुळे खजिना लुटला. सातार जेलच्या अठरा फूट उंचीच्या तटावरुन उडी मारुन पलायन केले. डीएसपी गिलबर्ट याच्या ऐतवडे येथील छाप्यावेळी घराच्या परसबागेच्या पाच फूट उंचीच्या भिंतीवरुन उडी मारुन वाऱ्याच्या वेगाने ते निसटले.

पंजाबहून आझाद हिंद सेनेतील नानकसिंग व मन्सासिंग या दोन सैनिकांना महाराष्ट्रात आणले. हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांची जिवंत स्मारके उभी करण्याचा त्यांनी संकल्प सोडला. अशा या जीवघेण्या संघर्षात अण्णांच्या अनेक निष्ठावान सैनिकांनी व कार्यकर्त्यांनी आपला जीव तळहातावर ठेवून त्यांना साथ दिली आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी भक्कम कवचही निर्माण केले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात ११ ऑगस्ट १९४७पासून जवळजवळ ६५ वर्षे अण्णा समाजसेवेत गुंतून राहिले होते. धरणग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त, शेतकरी, कामगार आणि दीनदलित यांच्या सुखासाठी, भाकरीसाठी, पाण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी अण्णांनी खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या, आंदोलने केली, मोर्चे काढले. यासाठी त्यांना प्रचंड अशी जनशक्ती मिळाली. आईसाहेब आणि कुसुमताई (माई) यांची मोलाची साथही लाभली. दि. २२ मार्च २०१२ रोजी अण्णांची प्राणज्योत मालवली आणि शतपावलांनी जळणारी एक धगधगती मशाल कायमची विझली. त्यांचे स्मारकस्थळ उभ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी कायम, पिढ्यानपिढ्या प्रेरणास्राेत राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही.

- प्रा. आनंदराव शिंदे (वाळवा)