शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शतज्वालांनी जळणारी एक धगधगती मशाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

ज्यांच्या जीवन प्रवासाला पावलागणिक आलेल्या जीवघेण्या प्रसंगांना, नि:स्वार्थी देशभक्तीच्या कार्याला, समाजोपयोगी अनेक चळवळींच्या अफाट कार्याला, मर्यादित शब्दांनी बांधणे कठीण ...

ज्यांच्या जीवन प्रवासाला पावलागणिक आलेल्या जीवघेण्या प्रसंगांना, नि:स्वार्थी देशभक्तीच्या कार्याला, समाजोपयोगी अनेक चळवळींच्या अफाट कार्याला, मर्यादित शब्दांनी बांधणे कठीण आहे, असे थोर क्रांतिवीर परमपूज्य नागनाथअण्णा यांची आज ९९ वी जयंती. त्यानिमित्ताने...

साधेपणा, निर्मळ नीतीमत्ता, पल्लेदार दूरदष्टी, जबरदस्त आत्मविश्वास, मानवतावादी विचार, धाडसी सावधपण, भ्रष्टाचार व अंधश्रध्दा यविषयीची चीड, भाेगवादीपणाचा तिरस्कार, भेदक तीक्ष्ण नजर, तत्वनिष्ठा ही क्रांतिवीर आण्णांना निसर्गाकडून मिळालेली मोठी देणगी होती. अण्णांचा जन्म १५ जुलै १९२२चा. त्यांना ८९ वर्षे ८ महिने ७ दिवस इतके दीर्घ आयुष्य लाभले. वयाच्या १८ वर्षापर्यंत अण्णा त्यांच्या स्वत:च्या घरचे सदस्य होते. त्यानंतर जवळजवळ ७० वर्षे ते घराच्या बाहेरच राहिले. १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७पर्यंत ५ वर्षे अण्णा देशाच्या स्वातंत्र्यासाठी अथकपणे लढले. या काळात त्यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटीश, भांडवलदार, सावकार, गावगुंड व घरभेदी यांना हतबल केले, दुष्ट शक्तींचा पुरता बिमोड केला. मोठ्या हिमतीने व धाडसाने त्यांनी गोव्यावरुन हत्यारे आणली, कागल तालुक्यातील कसबा सांगाव पोलीस ठाण्यामधून पोलिसांच्या बंदुका पळवल्या, पे ट्रेन लुटली आणि साडेपाच लाख रुपयांचा धुळे खजिना लुटला. सातार जेलच्या अठरा फूट उंचीच्या तटावरुन उडी मारुन पलायन केले. डीएसपी गिलबर्ट याच्या ऐतवडे येथील छाप्यावेळी घराच्या परसबागेच्या पाच फूट उंचीच्या भिंतीवरुन उडी मारुन वाऱ्याच्या वेगाने ते निसटले.

पंजाबहून आझाद हिंद सेनेतील नानकसिंग व मन्सासिंग या दोन सैनिकांना महाराष्ट्रात आणले. हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांची जिवंत स्मारके उभी करण्याचा त्यांनी संकल्प सोडला. अशा या जीवघेण्या संघर्षात अण्णांच्या अनेक निष्ठावान सैनिकांनी व कार्यकर्त्यांनी आपला जीव तळहातावर ठेवून त्यांना साथ दिली आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी भक्कम कवचही निर्माण केले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात ११ ऑगस्ट १९४७पासून जवळजवळ ६५ वर्षे अण्णा समाजसेवेत गुंतून राहिले होते. धरणग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, भूकंपग्रस्त, शेतकरी, कामगार आणि दीनदलित यांच्या सुखासाठी, भाकरीसाठी, पाण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी अण्णांनी खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या, आंदोलने केली, मोर्चे काढले. यासाठी त्यांना प्रचंड अशी जनशक्ती मिळाली. आईसाहेब आणि कुसुमताई (माई) यांची मोलाची साथही लाभली. दि. २२ मार्च २०१२ रोजी अण्णांची प्राणज्योत मालवली आणि शतपावलांनी जळणारी एक धगधगती मशाल कायमची विझली. त्यांचे स्मारकस्थळ उभ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी कायम, पिढ्यानपिढ्या प्रेरणास्राेत राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही.

- प्रा. आनंदराव शिंदे (वाळवा)