शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

कवठेएकंदमध्ये स्फोट; नऊ ठार

By admin | Updated: May 5, 2015 00:49 IST

चौघे गंभीर : फटाक्यांचा कारखाना जमीनदोस्त; १५ किलोमीटरचा परिसर हादरला

सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील ‘ईगल फायर वर्क्स’ या फटाके निर्मितीच्या कारखान्यात शोभेच्या दारूचा ‘आऊट’ तयार करताना झालेल्या भीषण स्फोटात नऊजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. कारखाना जमीनदोस्त झाला असून बांधकामातील वीट व सिमेंटचे अवशेष विखरून शंभर ते दीडशे फुटांवर जाऊन पडले. स्फोटामुळे १५ किलोमीटरचा परिसर हादरला.जखमीची प्रकृतीही चिंताजनक आहे. मृतांमध्ये सुनंदा रामचंद्र गिरी (वय ४५, रा. तुळजापूर-बुद्रुक, जि. सोलापूर), अनिकेत रामचंद्र गुरव (१६), इंदुबाई तुकाराम गुरव (७०), जुबेदा अकबर नदाफ (५५, तिघे रा. कवठेएकंद), शरद शिवाजी गुरव (३८) आणि रामचंद्र गिरी (४८) यांचा जागीच, तर राजेंद्र रामचंद्र गिरी (२२), तानाजी ईश्वर शिरतोडे (३२, दोघेही, रा. कवठेएकंद), अजित निशिकांत तोडकर (३२, वारणानगर, जि. कोल्हापूर), यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमी झालेले शिवाजी तुकाराम गुरव (४६) यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून, तर जखमींना एका टेम्पोतून रुग्णालयात आणण्यात आले. स्फोटाची घटना घडल्याची माहिती मिळाल्याने रुग्णालयातील आकस्मिक दुर्घटना विभागातील कक्ष सज्ज ठेवला होता. यातील कारखान्याचे मालक शिवाजी गुरव यांची आई इंदुबाई व मुलगा शरदचाही मृत्यू झाला आहे. शिरतोडे व जुबेदा नदाफ या कामाला होत्या. सुनंदा गिरी याही पती व मुलासह कामास होत्या. शिवाजी गुरव यांचे बंधू रामचंद्र हे दोघे कारखाना चालवित होते. कवठेएकंदपासून तीन किलोमीटर अंतरावर शिवाजी गुरव यांचा ईगल फायर वर्क्स हा फटाके निर्मितीचा कारखाना आहे. रस्त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शेतात हा कारखाना आहे. या ठिकाणी त्यांनी चार शेड उभी केली आहेत. प्रत्येक शेडच्या बांधकामात तीस ते चाळीस फुटाचे अंतर आहे. याठिकाणी ते तयार व कच्चा माल ठेवतात. एका शेडमध्ये ते फटाके तयार करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे पाच कामगार आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे फटाके तयार करण्याचे काम सुरू होते. शोभेच्या दारूचा आऊट तयार करताना अचानक भीषण स्फोट झाला. कारखान्यास आग लागून तो जमीनदोस्त झाला. शेजारीच एक केळीची बाग आहे. या बागेत एक मृतदेह उडून पडला. दोन मृतदेहांचे हात व पाय तुटून पडले होते. आग विझविण्यासाठी तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.