शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

Sangli: फडणवीस यांची 'साखर' चाल, उद्योगात नवी समीकरणं; भडंकबेत ४८ एकर जागेत कारखान्याची स्थापना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:50 IST

फडणवीस यांचे निष्ठावंत भाजपचे विक्रम पाटील यांनी विरोधी पॅनलचा पराभव करत साखर उद्योगात प्रवेश केला

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांचे सहकारी साखर उद्योगात वर्चस्व आहे. ऊस उत्पादकांच्या ताकदीवर पाटील यांची राजकारणात भक्कम पकड आहे. त्यांना शह देण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर उद्योगाच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. आता भडकंबे (ता. वाळवा) येथील प्रस्तावित साखर कारखान्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत भाजपचे विक्रम पाटील यांनी विरोधी पॅनलचा पराभव करत साखर उद्योगात प्रवेश केला आहे.तत्कालीन दिवंगत डॉ. एन. डी. पाटील यांच्या समर्थकांनी भडकंबे (ता. वाळवा) येथे २००० मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा प्रस्ताव तयार केला होता. यासाठी ४८ एकर जमीन आरक्षित करण्यात आली. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून नियोजित कारखान्याची उभारणी थंडावलेली होती.यामुळे यावर्षी या कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा झाली. यामध्ये शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शेतकरी विकास पॅनलने आपले उमेदवार निवडून दिले. त्यांच्याविरुद्ध भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांनी शेतकरी विकास पॅनल उभे करून विरोधी पॅनलचा पराभव केला. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात साखर उद्योगात विक्रम पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे.वाळवा तालुक्यात पहिला साखर कारखाना राजारामबापू पाटील यांनी उभारला. त्यानंतर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यावेळी काहींनी विरोध केला; तरीही हा कारखाना उभारला गेला. आमदार जयंत पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात एकूण तीन साखर कारखाने कार्यरत केले आणि ऊस उत्पादकांची ताकद वाढवली. आता त्यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर उद्योगात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित साखर कारखान्याची उभारणी दोन वर्षांत करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांना चांगला दर मिळेल आणि हजारो तरुणांना रोजगार मिळेल. - विक्रम पाटील, पॅनल प्रमुख, शेतकरी विकास पॅनल.