शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी भाजपचे सूर बिघडले

By admin | Updated: March 16, 2015 00:05 IST

भाजप हा शिस्त असलेला पक्ष म्हटले जात असले तरी, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये कोणतीही एकवाक्यता नाही.

सांगली : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादीने बिनविरोधसाठी सर्व पक्षांना आवाहन केले. काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षांनी या आवाहनास लगेच प्रतिसाद देऊन उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपचे घोडे अद्याप अडलेलेच आहे. बिनविरोधच्या मुद्द्यावरून भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांचे सूर बिघडले आहेत. त्यामुळे याबाबत पक्षीय स्तरावर काय निर्णय होणार, याकडे कार्यकर्त्यांचे आणि जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १0 मार्च रोजी जाहीर झाला. त्यानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आला. राष्ट्रवादीकडून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले होते. शनिवारी अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, भाजप वगळता सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. अन्य पक्षांप्रमाणे सुमनतार्इंना भाजपनेही पाठिंबा द्यावा, असे मत जिल्ह्यातील काही नेत्यांनी मांडले, तर काहींनी निवडणूक लढविण्याचा विचार मांडला. दोन मतप्रवाह निर्माण झाल्यामुळेच भाजपचा याबाबत निर्णय होऊ शकला नाही. सुमनतार्इंची उमेदवारी एकीकडे जाहीर होत असतानाच, भाजपचे खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी कवठेमहांकाळ येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली. कार्यकर्त्यांचीच भावना महत्त्वाची आहे, असे मत घोरपडे यांनी व्यक्त केले होते. कार्यकर्त्यांनी काय भावना मांडल्या, याची माहिती त्यांनी दिली नाही. निवडणूक बिनविरोधची कार्यकर्त्यांची भावना असती, तर दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे कारण नव्हते. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत कार्यकर्ते आग्रही असल्याची चर्चा रंगली आहे. सोमवारी यासंदर्भात पक्षीय स्तरावर निर्णय होणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)पक्षांतर्गत गोंधळ भाजप हा शिस्त असलेला पक्ष म्हटले जात असले तरी, जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये कोणतीही एकवाक्यता नाही. निवडणुकीबाबत कवठेमहांकाळ येथे बैठक घेतली जात असताना, त्यावेळी भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. गेल्या पंधरा दिवसांपासून ही चर्चा सुरू असताना जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, नेते एकत्र येऊन यावर चर्चा करू शकले नाहीत.