शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भाजपमध्ये उमेदवारीचे त्रांगडे, संशयाचे धुराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:04 IST

घोरपडे यांनी २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी फारकत घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्यांनी भाजपशी सूर जुळवले.

ठळक मुद्देतासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ : ज्योतीताताईच्या चर्चेने घोरपडे गटात अस्वस्थतावास्तविक लोकसभा निवडणुकीवेळीच, घोरपडे विधानसभा लढविणार, हे स्पष्ट झाले होते.

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी भाजपकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियातून, खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांचे नाव चर्चेत आले. त्यामुळे भाजपमध्ये संशयाचे धुराडे पेटले आहे. या चर्चेने घोरपडे समर्थकांत अस्वस्थता दिसून येत आहे. यानिमित्ताने उमेदवारीचे त्रांगडे निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घोरपडे यांनी २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी फारकत घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्यांनी भाजपशी सूर जुळवले. त्याचवेळी २०१९ च्या विधानसभेसाठी घोरपडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मतदारसंघात तशी चर्चाही होती. लोकसभेसाठी घोरपडेंनी केलेला पैरा विधानसभेला खासदारांकडून फेडला जाईल, असे बोलले जात होते. पण दोन दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यातील काही खासदार समर्थकांकडून विधानसभेसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांचे नाव चर्चेत आणले. या चर्चेने लोकसभेला शांत झालेले संशयाचे धुराडे पुन्हा पेटले आहे.

वास्तविक लोकसभा निवडणुकीवेळीच, घोरपडे विधानसभा लढविणार, हे स्पष्ट झाले होते. त्यासाठीच त्यांनी महिन्याभरापासून तासगाव तालुक्यात संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. याची पूर्ण जाणीव खासदार समर्थकांनादेखील आहे. मात्र तरीदेखील ज्योतीताइंच्या उमेदवारीची चर्चा व्हायरल करण्यात आली. ही चर्चा खासदारप्रेमापोटी होती, की जाणीवपूर्वक घडवून आणली आहे, याबाबत मतदार संघातील भाजप समर्थकांत काथ्याकूट सुरू झाला आहे.

घोरपडेंना विधानसभा निवडणुकीसाठी खासदारांची मदत घेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांच्या मदतीशिवाय ते मैदानात उतरणार नाहीत, हे स्पष्ट आहे. विधानसभेच्या निमित्ताने सरकारांनी राष्टÑवादीशी असलेली सोयरिकदेखील तोडलेली आहे. दुसरीकडे खासदारांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात मोळी घट्ट बांधली आहे. त्यामुळे ऐनवेळी ज्योतीतार्इंचे नाव पुढे रेटले गेल्यास, सरकारांची कोंडी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे ज्योतीतार्इंचे नाव चर्चेत आलेच कसे, याचीच चर्चा सुरु झाली असून या चर्चेने सरकार समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत तर भाजपमध्ये उमेदवारीचे त्रांगडे अन् संशयाचे धुराडे अशीच परिस्थिती असून खासदार संजयकाका पाटील यांच्या भूमिकेवरच पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे.गमती-जमती कशासाठी?ज्योतीतार्इंच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. ज्योतीतार्इंना उमेदवारी मिळाली तर विजय सोपा जाईल, असा एक सूर आहे, तर दुसरीकडे अजितराव घोरपडेंसारखा अनुभवी आणि जाणकार उमेदवार असेल, तर भविष्यात विकासाला चालना मिळविणे सोयीस्कर होईल. त्याहीपेक्षा दोन्ही नेते एकत्रित असणेच भाजपच्या हिताचे असल्याची चर्चा भाजपत सुरू आहे. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या चर्चेच्या गमती-जमती कशासाठी सुरू आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली