शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये उमेदवारीचे त्रांगडे, संशयाचे धुराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:04 IST

घोरपडे यांनी २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी फारकत घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्यांनी भाजपशी सूर जुळवले.

ठळक मुद्देतासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ : ज्योतीताताईच्या चर्चेने घोरपडे गटात अस्वस्थतावास्तविक लोकसभा निवडणुकीवेळीच, घोरपडे विधानसभा लढविणार, हे स्पष्ट झाले होते.

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी भाजपकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियातून, खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांचे नाव चर्चेत आले. त्यामुळे भाजपमध्ये संशयाचे धुराडे पेटले आहे. या चर्चेने घोरपडे समर्थकांत अस्वस्थता दिसून येत आहे. यानिमित्ताने उमेदवारीचे त्रांगडे निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

घोरपडे यांनी २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी फारकत घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्यांनी भाजपशी सूर जुळवले. त्याचवेळी २०१९ च्या विधानसभेसाठी घोरपडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मतदारसंघात तशी चर्चाही होती. लोकसभेसाठी घोरपडेंनी केलेला पैरा विधानसभेला खासदारांकडून फेडला जाईल, असे बोलले जात होते. पण दोन दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यातील काही खासदार समर्थकांकडून विधानसभेसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांचे नाव चर्चेत आणले. या चर्चेने लोकसभेला शांत झालेले संशयाचे धुराडे पुन्हा पेटले आहे.

वास्तविक लोकसभा निवडणुकीवेळीच, घोरपडे विधानसभा लढविणार, हे स्पष्ट झाले होते. त्यासाठीच त्यांनी महिन्याभरापासून तासगाव तालुक्यात संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. याची पूर्ण जाणीव खासदार समर्थकांनादेखील आहे. मात्र तरीदेखील ज्योतीताइंच्या उमेदवारीची चर्चा व्हायरल करण्यात आली. ही चर्चा खासदारप्रेमापोटी होती, की जाणीवपूर्वक घडवून आणली आहे, याबाबत मतदार संघातील भाजप समर्थकांत काथ्याकूट सुरू झाला आहे.

घोरपडेंना विधानसभा निवडणुकीसाठी खासदारांची मदत घेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांच्या मदतीशिवाय ते मैदानात उतरणार नाहीत, हे स्पष्ट आहे. विधानसभेच्या निमित्ताने सरकारांनी राष्टÑवादीशी असलेली सोयरिकदेखील तोडलेली आहे. दुसरीकडे खासदारांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात मोळी घट्ट बांधली आहे. त्यामुळे ऐनवेळी ज्योतीतार्इंचे नाव पुढे रेटले गेल्यास, सरकारांची कोंडी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे ज्योतीतार्इंचे नाव चर्चेत आलेच कसे, याचीच चर्चा सुरु झाली असून या चर्चेने सरकार समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत तर भाजपमध्ये उमेदवारीचे त्रांगडे अन् संशयाचे धुराडे अशीच परिस्थिती असून खासदार संजयकाका पाटील यांच्या भूमिकेवरच पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे.गमती-जमती कशासाठी?ज्योतीतार्इंच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. ज्योतीतार्इंना उमेदवारी मिळाली तर विजय सोपा जाईल, असा एक सूर आहे, तर दुसरीकडे अजितराव घोरपडेंसारखा अनुभवी आणि जाणकार उमेदवार असेल, तर भविष्यात विकासाला चालना मिळविणे सोयीस्कर होईल. त्याहीपेक्षा दोन्ही नेते एकत्रित असणेच भाजपच्या हिताचे असल्याची चर्चा भाजपत सुरू आहे. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या चर्चेच्या गमती-जमती कशासाठी सुरू आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली