शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

महापुरावरून भाजप-राष्टवादी, काँग्रेसमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 6:57 PM

महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्यावतीने पडळकर यांच्यावर टीका करण्यात आली.

ठळक मुद्देमहापुरावरून भाजप-राष्टवादी, काँग्रेसमध्ये जुंपलीआपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका

सांगली : महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्यावतीने पडळकर यांच्यावर टीका करण्यात आली.आ. पडळकर यांनी मंगळवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर आपत्तीपूर्व नियोजनावरून टीका केली होती. पडळकर म्हणाले होते की, मागील महापुराचा अंदाज घेऊन यावेळी उपाययोजना करणे गरजेचे होते. जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये अद्याप बोटी दिलेल्या नाहीत.

भविष्यात महापुराच्या माध्यमातून एखादी दुर्घटना घडली, तर पालकमंत्री जयंत पाटील व शासन त्यास जबाबदार राहील. खासदार संजयकाका पाटील यांनीही, स्थानिक नेत्यांना महत्त्वाच्या बैठकांना डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली होती.

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना बेदखल करण्याबाबतचा हा मुद्दा भाजपचे सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनीही उपस्थित केला होता. भाजप नेत्यांनी एकीकडे जयंत पाटील यांच्यावर टीका सुरू केली असताना, युवक राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने पडळकरांवर हल्लाबोल केला आहे.युवक काँग्रेसचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अजित दुधाळ यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अद्याप पूर आला नसताना आपत्तीचे, दुर्घटनांचे संभाव्य चित्र निर्माण करून पडळकर पालकमंत्री व शासनास जबाबदार ठरविण्याची तयारी करीत आहेत. त्यांची टीका ही द्वेषातून व स्वार्थापोटीची आहे.

मागील महापुरावेळी राज्यात भाजप सत्तेवर होते. त्यावेळी जिल्ह्यात दुर्घटना घडली. आपत्ती काळातील नियोजन फसले होते. त्यामुळे त्याची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवायची का? मागील महापुरातील नियोजनाबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि त्यानंतर आपत्तीपूर्व नियोजनावर बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले की, मागील महापुराच्या काळात भाजपने काय नियोजन केले? भाजपचे नेते तेव्हा कुठे होते, ते स्वत: कोठे होते हे स्पष्ट करावे. महापुरात जनता तळमळत असतानाही भाजपच्या तत्कालीन मंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतली. विरोधात असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी कर्तव्यभावनेने पूरग्रस्तांना मदत केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली