शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारूंची उपमा- पृथ्वीराज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 19:53 IST

सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे केली.

सांगली : बड्या धेंडांनी बँकांच्या माध्यमातून देशाला लुटून परदेश गाठले तरीही भाजपा नेते दुस-याच पक्षाला लुटारुंची उपमा देत फिरत आहेत. त्यांचे हे स्वच्छ प्रतिमेचे सोंग आता लोकांनी ओळखले आहे, अशी टीका काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे केली.भाजपाच्या युवा नेत्या पूनम महाजन यांनी नुकताच सांगली दौरा केला.यावेळी त्यांनी कॉंग्रेसला देशाचे लुटारू म्हणून संबोधले होते. या टीकेचा समाचार घेताना पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, भाजपामध्ये सहभागी झालेल्या आणि व्यासपीठावर बसलेल्या काही लोकांचा आढावा महाजन यांनी घेतला असता तरी त्यांनी अशा प्रकारची टीका केली नसती. ललित मोदी, नीरव मोदी यांनी देशाला करोडो रुपयांचा चुना लावून परदेश गाठले. त्यांना भाजपानेच अभय दिल्याचे चित्र आहे. अमित शाहांच्या पुत्राचीही चौकशी भाजपा सरकारने केली नाही. ना खाऊंगा, ना खाणे दुंगा अशी गर्जना करीत सत्तेवर आलेल्या भाजपाने आजवर अनेकांना खाऊ घातले. लुटीच्या घटना समोर आल्यानंतर या सर्वांना परदेशी जाताना भाजप नेते पाहत बसले. तरीही यांना देशाचे लुटारू विरोधी पक्षच वाटत आहेत. सांगलीत युवा परिषद घेऊन पक्षाच्या धोरणांचा गाजावाजा करणा-या पूनम महाजन यांनी किमान सांगलीत किती रोजगार उपलब्ध करून दिला, त्याची माहिती तरी जनतेला द्यायला हवी होती.तरुणांना बेरोजगार करून युवा मेळावे घेण्यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. सत्तेवर येताच प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये ठेवण्याचे दिलेले आश्वासन गेले कुठे? येणारे हे पैसे नेमके गेले तरी कुठे, याचा खुलासा भाजप नेत्यांनी करावा. शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या आत्महत्या, बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या, व्यावसाय, उद्योजकांचे सुरू असलेले हाल या गोष्टींना भाजपच जबाबदार आहे. कधी नव्हे इतकी मंदी आणि आर्थिक टंचाई देशाने पाहिली तीसुद्धा भाजपच्या कृपेनेच. त्यामुळे कितीही स्वच्छत प्रतिमेचे सोंग आणले तरी जनता आता त्यास फसणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.महापालिकेत झेंडा कॉंग्रेसचाचकितीही आटापीटा केला तरी महापालिकेत कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. सध्यस्थितीत उमेदवारही नसलेल्या भाजपचा कॉंग्रेसच्याच नगरसेवकांवर डोळा आहे. त्यामुळे आयात उमेदवारांवर भाजपने सत्तेचे स्वप्न बघू नये, असे पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस