शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडे निम्मे उमेदवार आयात केलेले : विशाल पाटील-भाजप म्हणजे बुडणारे जहाज;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:12 IST

राज्यात चार वर्षे सत्ता असूनही भाजपला सांगली महापालिका निवडणुकीत ७८ पैकी निम्मे उमेदवार आयात करावे लागले आहेत.

ठळक मुद्देसरकारकडे सांगलीच्या विकासाचा अजेंडाच नसल्याची टीका

सांगली : राज्यात चार वर्षे सत्ता असूनही भाजपला सांगली महापालिका निवडणुकीत ७८ पैकी निम्मे उमेदवार आयात करावे लागले आहेत. कारण भाजपकडे सांगलीच्या विकासाचा अजेंडाच नाही. त्यामुळे भाजपच्या बुडत्या जहाजात बसायला कोणीच तयार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना येथे केली.

ते म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी सांगलीत आले असता, ‘सांगलीला चांगली बनवू’, असे त्यांनी सांगितले होते, पण केंद्राकडून सांगलीला काहीच मिळाले नाही. त्यांनी सांगलीचा समावेश ‘स्मार्ट सिटी’ योजनेत का केला नाही? राज्यातही गेली चार वर्षे भाजप सत्तेत आहे. तरीही सांगली महापालिका निवडणुकीत त्यांना ७८ पैकी निम्मे उमेदवार आयात करावे लागले आहेत.

काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी होण्यापूर्वी भाजपने आमच्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला होता. ३०-३५ आजी-माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार, अशी हवा करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र लवचिकता दाखवण्याचे जाहीर करूनही उमेदवार मिळवताना त्यांची दमछाक झाली. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. भाजप हे बुडणारे जहाज आहे. त्यात कोणीच बसू इच्छित नाही.

काँग्रेसने राष्टÑवादीशी हातमिळवणी कशासाठी केली, या प्रश्नावर ते म्हणाले की, महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी तडजोडी आवश्यक होत्या. त्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली.ते म्हणाले की, भाजपचे ‘विकासाचे मॉडेल’ यंदाच्या पावसाळ्यात मुंबई आणि नागपूरमध्ये दिसले आहे. थोड्या पावसानेही ही मोठी शहरे विकासाच्या बोगस मॉडेलमुळे ठप्प झाली. ते आता सांगलीचा विकास काय करणार? त्यांच्याकडे सांगलीच्या विकासाचा अजेंडाच नाही. त्यांना येथील गरजा माहीत नाहीत. येथील अडचणींचा अभ्यास नाही.

केवळ बॅगांची चर्चा करून महापालिका निवडणुकीत उमेदवार मिळवावे लागले आहेत. या निवडणुकीत मंत्र्यांकडून पालघरप्रमाणे साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर सुरू आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीने नाकारलेले वादग्रस्त इच्छुक भाजपच्या यादीत उमेदवार बनले आहेत. गुंड प्रवृत्तीच्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यावर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावला आहे.

शेरीनाला शुद्धीकरण योजनेच्या पूर्णत्वासाठी थोडासाच निधी हवा आहे. मात्र तोही भाजप सरकारने दिलेला नाही. कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी भाजप सरकारने ‘नमामी गंगे’प्रमाणे ‘नमामी कृष्णा’ प्रकल्प का राबवला नाही? भाजपच्या नेत्यांवरील मिरज दंगलीतील खटले काढून घेण्यात आले, तसे इतर निरपराध लोकांवरील खटले कधी काढून घेणार?, असा सवाल करून पाटील म्हणाले की, जकात, एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिका आर्थिकदृष्ट्या विकलांग झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना शासनावर विसंबून राहावे लागत आहे. मात्र महापालिकांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी शासनाने कोणतीही सकारात्मक पावले उचललेली दिसत नाहीत.काँग्रेसमधील गटबाजीबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्यात गटबाजी अजिबात नाही. सर्वजण एकदिलाने काम करत आहोत. एकत्रित निर्णय घेत आहोत. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून महापालिकेत पुन्हा सत्ता नक्कीच आणू.वसंतदादा स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्षवसंतदादा पाटील हे केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर राज्याचे नेते होते. त्यांची जन्मशताब्दी साजरी करणे, हे सरकारचे कर्तव्य होते. मात्र सरकारने जन्मशताब्दी समितीची एकही बैठक स्थानिक किंवा प्रदेश पातळीवर घेतली नाही. वसंतदादा स्मारकाला कमी पडत असलेला निधी देण्यातही स्वारस्य दाखवलेले नाही, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक