शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

भाजपकडे निम्मे उमेदवार आयात केलेले : विशाल पाटील-भाजप म्हणजे बुडणारे जहाज;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:12 IST

राज्यात चार वर्षे सत्ता असूनही भाजपला सांगली महापालिका निवडणुकीत ७८ पैकी निम्मे उमेदवार आयात करावे लागले आहेत.

ठळक मुद्देसरकारकडे सांगलीच्या विकासाचा अजेंडाच नसल्याची टीका

सांगली : राज्यात चार वर्षे सत्ता असूनही भाजपला सांगली महापालिका निवडणुकीत ७८ पैकी निम्मे उमेदवार आयात करावे लागले आहेत. कारण भाजपकडे सांगलीच्या विकासाचा अजेंडाच नाही. त्यामुळे भाजपच्या बुडत्या जहाजात बसायला कोणीच तयार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना येथे केली.

ते म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी सांगलीत आले असता, ‘सांगलीला चांगली बनवू’, असे त्यांनी सांगितले होते, पण केंद्राकडून सांगलीला काहीच मिळाले नाही. त्यांनी सांगलीचा समावेश ‘स्मार्ट सिटी’ योजनेत का केला नाही? राज्यातही गेली चार वर्षे भाजप सत्तेत आहे. तरीही सांगली महापालिका निवडणुकीत त्यांना ७८ पैकी निम्मे उमेदवार आयात करावे लागले आहेत.

काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी होण्यापूर्वी भाजपने आमच्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला होता. ३०-३५ आजी-माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार, अशी हवा करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र लवचिकता दाखवण्याचे जाहीर करूनही उमेदवार मिळवताना त्यांची दमछाक झाली. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. भाजप हे बुडणारे जहाज आहे. त्यात कोणीच बसू इच्छित नाही.

काँग्रेसने राष्टÑवादीशी हातमिळवणी कशासाठी केली, या प्रश्नावर ते म्हणाले की, महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी तडजोडी आवश्यक होत्या. त्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली.ते म्हणाले की, भाजपचे ‘विकासाचे मॉडेल’ यंदाच्या पावसाळ्यात मुंबई आणि नागपूरमध्ये दिसले आहे. थोड्या पावसानेही ही मोठी शहरे विकासाच्या बोगस मॉडेलमुळे ठप्प झाली. ते आता सांगलीचा विकास काय करणार? त्यांच्याकडे सांगलीच्या विकासाचा अजेंडाच नाही. त्यांना येथील गरजा माहीत नाहीत. येथील अडचणींचा अभ्यास नाही.

केवळ बॅगांची चर्चा करून महापालिका निवडणुकीत उमेदवार मिळवावे लागले आहेत. या निवडणुकीत मंत्र्यांकडून पालघरप्रमाणे साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर सुरू आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीने नाकारलेले वादग्रस्त इच्छुक भाजपच्या यादीत उमेदवार बनले आहेत. गुंड प्रवृत्तीच्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यावर बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपने गमावला आहे.

शेरीनाला शुद्धीकरण योजनेच्या पूर्णत्वासाठी थोडासाच निधी हवा आहे. मात्र तोही भाजप सरकारने दिलेला नाही. कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी भाजप सरकारने ‘नमामी गंगे’प्रमाणे ‘नमामी कृष्णा’ प्रकल्प का राबवला नाही? भाजपच्या नेत्यांवरील मिरज दंगलीतील खटले काढून घेण्यात आले, तसे इतर निरपराध लोकांवरील खटले कधी काढून घेणार?, असा सवाल करून पाटील म्हणाले की, जकात, एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिका आर्थिकदृष्ट्या विकलांग झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना शासनावर विसंबून राहावे लागत आहे. मात्र महापालिकांच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी शासनाने कोणतीही सकारात्मक पावले उचललेली दिसत नाहीत.काँग्रेसमधील गटबाजीबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्यात गटबाजी अजिबात नाही. सर्वजण एकदिलाने काम करत आहोत. एकत्रित निर्णय घेत आहोत. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून महापालिकेत पुन्हा सत्ता नक्कीच आणू.वसंतदादा स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्षवसंतदादा पाटील हे केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर राज्याचे नेते होते. त्यांची जन्मशताब्दी साजरी करणे, हे सरकारचे कर्तव्य होते. मात्र सरकारने जन्मशताब्दी समितीची एकही बैठक स्थानिक किंवा प्रदेश पातळीवर घेतली नाही. वसंतदादा स्मारकाला कमी पडत असलेला निधी देण्यातही स्वारस्य दाखवलेले नाही, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक