शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : काँग्रेसला जे जमले नाही ते बदल भाजपने केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 16:04 IST

काँग्रेसच्या काळात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हून अधिक योजना आखल्या. देशाची दिशाच बदलली आहे. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल देवेंद्र फडणवीस सरकारने केला. नवभारत निर्मितीच्या संकल्पनेत नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ठळक मुद्दे काँग्रेसला जे जमले नाही ते बदल भाजपने केलेगोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संवाद कार्यक्रम

सांगली : काँग्रेसच्या काळात एकही योजना पूर्णत्वास गेली नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८० हून अधिक योजना आखल्या. देशाची दिशाच बदलली आहे. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल देवेंद्र फडणवीस सरकारने केला. नवभारत निर्मितीच्या संकल्पनेत नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.सांगली विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ भाजपच्या प्रज्ञा सेलच्यावतीने महाजनादेश, महाचर्चा या संवाद कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. यावेळी महापौर संगीता खोत, प्रज्ञा सेलचे प्रदेशाध्यक्ष शिरीष देशपांडे, विधानसभा प्रभारी दीपक शिंदे-म्हैसाळकर, संजय परमणे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, सतीश मालू उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, भाजपचे सरकार अंत्योदय तत्त्वावर चालणारे आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना आखल्या. जनधन, सुकन्या, उज्ज्वला, आयुष्यमान अशा अनेक योजनेतून सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले. याउलट काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले.

महाराष्ट्रातही त्यांची सत्ता होती. केवळ स्वार्थासाठी त्यांचा कारभार सुरू होता. एकही योजना अंमलात आणली नाही. पंधरा वर्षात जो बदल काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात करता आला नाही, तो बदल फडणवीस सरकारने केला. विरोधकांना आरोप करण्यासाठी एकही मुद्दा नाही. सांगलीत आ. गाडगीळ यांनी कोट्यवधीची कामे केली आहेत. समाजातील प्रोफेशनल्समध्ये काम करणाऱ्या घटकांनी या बदलत्या राजकारणात सहभागी व्हावे, असे आवाहनही सावंत यांनी केले.यावेळी उद्योजक सतीश मालू, डॉ. भारती शिंदे यांचीही भाषणे झाली. संजय परमणे यांनी स्वागत केले. डॉ. रणजित जाधव, विजय पाटील, प्रमोद शिंदे, शैलेश पवार, बी. बी. सुल्ह्यान, विनायक शेटे, एस. एल. पाटील, अ‍ॅड. समीर पटवर्धन, सुनील माणकापुरे, डॉ. सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाSudhir Gadgilसुधीर गाडगीळsangli-acसांगली