शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादीत लढत

By admin | Updated: October 2, 2014 00:19 IST

जत मतदारसंघ : अकराजण रिंगणात; खांदेपालटानंतर चुरशीचा सामना

जयवंत आदाटे - जत विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात अकरा उमेदवार आहेत. त्यामध्ये सात राजकीय पक्षांचे उमेदवार व चार अपक्षांचा समावेश आहे. या अकरामध्ये एकमेव महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. अकरा उमेदवार असले तरी, येथील निवडणूक भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच होणार आहे.आमदार प्रकाश शेंडगे २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. यावेळी ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. मागील पाच वर्षात त्यांचा जनसंपर्क कमी होता. त्यामुळे भाजपमध्येच त्यांच्याबद्दल नाराजी होती. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यावेळी त्यांचे समर्थन केलेले कार्यकर्ते आता त्यांच्याविरोधात आहेत. या विरोधकांना थोपवून राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक प्रचार यंत्रणा राबविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. धनगर समाज आणि मागासवर्गीय समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आमदार शेंडगे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये त्यांना कितपत यश येईल, हे १९ रोजीच स्पष्ट होईल.मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणारे विलासराव जगताप यावेळी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे यांना डावलून पक्षाची उमेदवारी मिळविण्यात जगताप यांनी बाजी मारली आहे. यामुळे त्यांनी आधीच निम्मी बाजी मारली आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये असूनही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांना जगताप यांनी मदत केली होती. त्यामुळे आता त्यांच्या पाठीशी खासदार पाटील संपूर्ण ताकद लावणार, हे स्पष्ट आहे. एकेकाळी जगताप यांचे समर्थक मानले गेलेले आणि काही कारणांमुळे नाराज होऊन दूर गेलेले प्रभाकर जाधव व प्रकाश जमदाडे यांना आपलेसे करून त्यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. याचा त्यांना निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.भारती बँकेचे संचालक व माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नातेवाईक विक्रम सावंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. जत मतदारसंघात १४ ते १६ हजार इतका तरुण मतदार आहे. फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅप या सोशल मीडियाचा वापर करून नवतरुण मतदारांना त्यांनी आकर्षित केले आहे. याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील वसंतदादा गटाचे प्रमुख सुरेश शिंदे यांनी त्यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली होती. मात्र शिंदे यांचे बंड शमवण्याची जबाबदारी डॉ. कदम यांनी मदन पाटील यांच्यावर टाकली होती. शिंदे यांनी बंड मागे घेतले असले तरी पक्षांतर्गत नाराजांची मर्जी सांभाळून वसंतदादा गटाला शह देताना विक्रम सावंत यांची दमछाक होणार आहे.जत विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात अकरा उमेदवार असले तरी, प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप आणि विक्रम सावंत हे तिघेच तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार आहे. प्रचारयंत्रणा यशस्वीपणे राबवून मतदारांना भेटून त्यांचे रूपांतर मतदानात करून घेण्यात जो उमेदवार यशस्वी होईल, त्याला यश मिळण्याची शक्यता आहे. ऐनवेळी केलेले पक्षांतर, तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेचे पाणी, जत येथे होणारे कृषी महाविद्यालय, खराब रस्ते आदी प्रमुख प्रश्न प्रचारातील मुद्दे राहणार आहेत. नावपक्षप्रकाश शेंडगे राष्ट्रवादीविलासराव जगताप भाजपविक्रम सावंत काँग्रेसभाऊसाहेब कोळेकर मनसेसंगाप्पा तेली शिवसेनाजकाप्पा सर्जे बसपाबबन शिंगाडेशेकापदिनकर पतंगे अपक्षरवींद्र सोनार अपक्षसखुबाई खांडेकर अपक्षसुनील दलवाई अपक्ष