शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजप-काँग्रेस आघाडीत सांगलीत सत्तेसाठी रस्सीखेच सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 19:14 IST

जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अर्थमंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २ जानेवारी रोजी होणार असून, यावेळी मतदान करणा-या सदस्यांची संख्या ५९ आहे. यापैकी भाजपच्या चिन्हावर आलेले २४ सदस्य गोव्याच्या सहलीवर आहेत.

सांगली : जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी राष्टÑवादी, काँग्रेस आघाडी आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपच्या सदस्यांपाठोपाठ आता आघाडीचे २२ सदस्य हैदराबादच्या सहलीवर गेले आहेत. भाजपच्या सहलीत एकूण २४ सदस्य असून संजयकाका गटाचे चार सदस्य जिल्ह्यातच आहेत. त्यामुळे संख्याबळाचे गणित अद्याप स्पष्ट नसल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अर्थमंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २ जानेवारी रोजी होणार असून, यावेळी मतदान करणाºया सदस्यांची संख्या ५९ आहे. यापैकी भाजपच्या चिन्हावर आलेले २४ सदस्य गोव्याच्या सहलीवर आहेत. रविवारी ते तिथून चेन्नईला जाणार असल्याचे समजते. भाजपचे खासदार संजयकाका पाटील समर्थक डी. के. काका पाटील, नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर आणि जि. प.चे उपाध्यक्षपदाचे दावेदार शिवाजी डोंगरे हे चार सदस्य सहलीस गेले नसले तरी, ते भाजपसोबतच राहणार असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्याचबरोबर ब्रह्मदेव पडळकर, प्रमोद शेंडगे हे दोन अपक्ष सदस्य भाजपकडे आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा पार करता येईल, असा भाजपला विश्वास वाटतो.

दुसरीकडे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार गटासह शिवसेनेचे तीन व अजितराव घोरपडे गटाचे दोन सदस्य आघाडीकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. रविवारी आघाडीचे २२ सदस्य सहलीवर गेले आहेत. शिवसेना व घोरपडे गटाची बेरीज करून खासदार गटाला खेचल्यास सत्तेचे गणित जमेल, असा विश्वास जयंत पाटील यांना वाटतो.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे १४ अधिक १ असे १५ सदस्य आहेत. पण, शनिवारी इस्लामपुरात झालेल्या बैठकीला एक सदस्य गैरहजर राहिल्यामुळे उलट-सुलट चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे भगवान वाघमारे     हे भाजपच्या सहलीमध्ये गेल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राष्टÑवादी नेत्यांनी सदस्यांना व्हिप बजावला आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादीचे एकूण २२ सदस्य सहलीला गेल्याची   माहिती आघाडीच्या नेत्यांनी दिली.

संख्याबळाचे गणित आघाडीला जमणार का, याकडे आता सर्वांचे   लक्ष लागले आहे. राज्यातील महाविकास आघाडी आता जिल्हा परिषदेत साकारणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तेचे राजकारण तापले असून सदस्यांच्या खेचाखेचीत नेते गुंतले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक