शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

महाकाय ‘टेंभू’ जाणार ४,८१५ कोटींवर

By admin | Updated: June 7, 2017 00:17 IST

महाकाय ‘टेंभू’ जाणार ४,८१५ कोटींवर

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : केवळ स्वत:च्या काठावरीलच नव्हे, घाटमाथ्यावरील पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या कायम दुष्काळी जनतेचा आक्रोश ऐकून कृष्णामाई उजाड माळरानावर ओलावा निर्माण करण्यासाठी टेंभूपासून सांगोल्यापर्यंत धावू लागली आहे.दुसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालाच्या मंजुरीनंतर टेंभू उपसा सिंचन योजना ४ हजार ८१५ कोटींची होत आहे. या महाकाय प्रकल्पासाठी गेल्या २२ वर्षांत एकंदरीत दोन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या योजनेला कोयना, वांग, तारळी प्रकल्पातील २२.१३ टीएमसी पाणी कृष्णा नदीतून उचलण्याची मंजुरी आहे. ही योजना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आजच्या युगातील अफाट नमुना आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांतील २१० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणारी ही योजना गरजेप्रमाणे अखंडित सुरु ठेवण्याचे आव्हान राज्यकर्ते, शासकीय अधिकारी, लाभक्षेत्रातील शेतकरी तसेच साखर कारखानदार नेत्यांसमोर उभे आहे. या आव्हानाला समन्वयाने सामोरे जाण्याचीच गरज आहे. सद्यस्थितीत टेंभू योजनेतून सुमारे ३० हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. योजनेचा आराखडा मंजूर झाल्यानंतर १९ फेब्रुवारी १९९६ रोजी १ हजार ४१६ कोटींच्या या योजनेला मान्यता मिळाली. त्यानंतर २१०६ कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल २००४ मध्ये मंजूर झाला. आतापर्यंत या योजनेचा खर्च दोनहजार कोटी इतका झाला आहे. आता तर ही योजना पूर्ण करण्यासाठी एकंदरीत ४ हजार ८१५ कोटी इतका खर्च येणार आहे. कृष्णा नदीवर कऱ्हाडजवळील टेंभू या गावी मोठा बराज बांधून पाणी अडविले आहे. येथील ११ भल्या मोठ्या दरवाजांद्वारे पाणी अडवून हे पाणी लगतच्याच टप्पा क्रमांक १ अमध्ये सोडले आहे. टप्पा क्रमांक १ अमधून हे पाणी ६१ मीटर इतक्या खड्या उंचीवर असलेल्या टप्पा क्र. १ बमध्ये सोडले आहे. यासाठी टप्पा क्र. १ अमध्ये १९५० अश्वशक्तीचे ३३ पंप बसवण्यात आले आहेत. यापैकी १५ पंप सध्या सुरु आहेत. टप्पा क्रमांक १ बमधून हे पाणी पुन्हा ८५ मीटर उचलले जाऊन सहा महाकाय जलवाहिन्यांद्वारे खंबाळे बोगद्याच्या सुरुवातीस वितरण हौदामध्ये टाकले गेल आहे. तेथून खंबाळे बोगदा पास करून जोड कालव्याद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये ते प्रवेश करते. कडेगाव तालुक्यात मुख्य कालव्याला फाटा देऊन ते शिवाजीनगर तलावात असलेल्या टप्पा क्र. २ मध्ये सोडण्यात आले आहे. टप्पा क्रमांक २ मध्ये १४०० अश्वशक्तीचे तीन पंप बसविण्यात आले आहेत. या पंपांद्वारे सुर्ली आणि कामथी कालव्यात पाणी सोडले जाते. मुख्य कालव्यातून फाट्याद्वारे हे पाणी पुढे थेट नंदणी नदीवर असलेल्या हिंगणगाव बुद्रुक तलावात सोडले आहे. तेथून गरजेप्रमाणे टेंभू योजनेचे पाणी नंदणी नदीत सोडले जाते. याच मुख्य कालव्यातून हे पाणी माहुली (ता. खानापूर) येथील टप्पा क्रमांक ३ च्या तलावात जाते. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये या टेंभू योजनेद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये अत्यंत दुष्काळी अशा पट्ट्यात लाभक्षेत्रातील २५ गावांना शेतीसाठी पाणी दिले आहे. आता ऐन उन्हाळ्यात लहान-मोठे तलाव भरून घेतले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे पाणी माहुली पंपगृहापासून पुढे प्रवास करीत खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्यांत गेले आहे. टप्पा क्र. १ अ, १ ब, २, ३, ४, ५ असे सहा टप्पे आहेत. याच योजनेवर पुणदी आणि विसापूर या उपसा सिंचन योजना कार्यान्वित आहेत.कृष्णामाई एक्स्प्रेस :टेंभू ते सांगोला तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्चूनही पूर्ण न झालेली आणि पावणेपाच हजार कोटी खर्चावर पोहोचलेली टेंभू उपसा जलसिंचन योजना आता औत्सुक्याचा विषय ठरली आहे. या योजनेमुळे सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यांतील ८० हजार हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. १९९६ मध्ये प्रत्यक्ष खर्चाला मान्यता मिळाल्यानंतर २१ वर्षांनंतरही ही योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेचा प्रवास, प्रत्यक्ष मार्ग, महाकाय यंत्रणा, पाणी वितरण व्यवस्था, सद्यस्थिती, पाणीपट्टी वसुली, योजनेपुढील अडचणी-संकटे, पुढील टप्पे रखडण्याची कारणे, उपाययोजना यांचा ऊहापोह करणारी ही मालिका आजपासून... सद्यस्थितीत असलेले कालवे आणि लांबी सुर्ली (२३ कि.मी.), कामथी (१६ कि.मी. ), भरण कालवा टप्पा क्रमांक १ ते हिंगणगाव (१५ कि.मी.), हिंगणगाव ते येरळा नदी (२४ कि.मी.), येरळा नदी ते टप्पा क्र. ३ (८ कि.मी.), टप्पा क्र. ३ ते घाणंद ( १८ कि. मी.), आटपाडी कालवा (१५ किलोमीटर), घाणंद ते हिवतड ३२ कि.मी., सांगोला (५० कि.मी.), कवठेमहांकाळ (कालवा ४१ किलोमीटर) अशा १० कालव्याद्वारे २४२ कि.मी. सांगोल्यापर्यंत आणि टप्पा क्र. ३ बमधून भाग्यनगर तलाव (१२ कि.मी.) असा एकंदरीत ३५० किलोमीटर अंतराचा दीर्घ प्रवास करीत कृष्णामाई धावत आहे. विविध टप्प्यात एकंदरीत ६४० मीटर पाणी उचलून दुष्काळी भागाला दिले आहे.