शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

महापालिकेत काँग्रेसचाही झाला ‘बिग बझार’

By admin | Updated: April 22, 2015 00:27 IST

भाकीत उलटले : मिरज पॅटर्नच्या विस्तवाने सत्ताधाऱ्यांच्या छपरालाही आग

शीतल पाटील - सांगली जयंत पाटील यांच्या महाआघाडीचा बिग बझार होईल, असे भाकीत काही वर्षांपूर्वी माजी मंत्री मदन पाटील यांनी केले आणि ते खरे ठरले. मात्र त्याच वाक्याचे बूमरॅँग आता कॉँग्रेसवर उलटल्याने महाआघाडीपेक्षाही वाईट ‘बिग बझार’ कॉँग्रेसच्या सत्ताकाळात अनुभवास येत आहे. महाआघाडीच्या बिघाडीस जो मिरज पॅटर्न कारणीभूत ठरला, त्याच पॅटर्नच्या विस्तवाने आता कॉँग्रेसच्या छपरालाही आग लागली आहे. मिरज पॅटर्नचा अनुभव कसा होता?, असा प्रश्न जयंतरावांना महापालिका निवडणुकीनंतर विचारला होता. तेव्हा स्मितहास्य करीत ‘चांगलाच’ असे एका शब्दात त्यांनी उत्तर दिले होते. मिरजेतील पदाधिकाऱ्यांनी महाआघाडीच्या शेवटच्या दोन वर्र्षांत अक्षरश: धुमाकूळ घातला. त्याला काँग्रेसची साथ होती, हे नाकारून चालणार नाही. आता तीच मंडळी पुन्हा महापालिकेत निवडून आली, पण यंदा त्यांच्या खांद्यावर काँग्रेसचा झेंडा होता. सांगलीच्या जनतेनेही काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकत एकहाती सत्ता दिली. गेल्या पंधरा वर्षांत पालिकेच्या कारभाराचा खेळखंडोबा थांबून एकहाती कारभार व्हावा, एवढीच जनतेची अपेक्षा होती; पण आता ती फोल ठरू लागली आहे. काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी दोन वर्षांत एका विचाराने कारभार करता आलेला नाही. कधी भुयारी गटार योजनेवरून वाद होतो, तर कधी विकास कामांच्या निधीवरून! गेल्या पंधरा दिवसात तर काँग्रेसअंतर्गत संघर्षाने टोक गाठले आहे. पालिकेत महापौर, गटनेते, स्थायी समिती सभापती ही तीनही महत्त्वाची पदे मिरजेच्या कारभाऱ्यांकडे आहेत. या तीन पदाधिकाऱ्यांत एकवाक्यता नाही. सांगलीतील नगरसेवकांना तर कोणाचेच नेतृत्व नाही. या तीन पदाधिकाऱ्यांच्या मागे फरफटत जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नाही. स्वत:चे हितसंबंध जोपासण्यात मिरज पॅटर्नमधील नेतेमंडळी गुंतली आहेत. सध्या पालिकेतील काँग्रेसमध्ये उघडरित्या तीन गट पडले आहेत. एक महापौरांचा, दुसरा गटनेत्यांचा आणि तिसरा स्थायी सभापतींचा! तीन गटातून एकमेकांवर कुरघोड्या सुरू आहेत. स्थायी समिती सभेत गोंधळ घालणारे महापौर गटाचे, तर महासभेत दंगा करणारे सभापती व गटनेते गटाचे आहेत. महासभेतील ऐनवेळी घुसडलेले ठराव उधळून लावल्यात आले. त्याच वेळी स्थायी समितीचा गोंधळही चर्चेत आला. आता तर महापौरांनी काँग्रेसला घरचा आहेर देत, काही सदस्यांचे हितसंबंध जोपासण्यास नकार दिल्याने गदारोळ केल्याचा आरोप केला आहे. हा सारा प्रकार किळसवाणा असून, नगरसेवकांना जनतेच्या हिताशीे काहीच देणे-घेणे नाही, असेच म्हणावे लागले.सोमवारच्या महासभेत काँग्रेसमधील संघर्षाने पातळी सोडली. महापौरांविरोधात सारे एकवटले, पण त्याचवेळी महापौरांवरील राग नगरसचिवांवर काढण्यात आला. तो कितपत योग्य होता? याचे आत्मचिंतन काँग्रेसला करावे लागणार आहे.महाआघाडीने किमान तीन वर्षे एकमुखी कारभार केला होता. शेवटच्या दोन वर्षात जयंतरावांना हादरे बसले. त्यांचा बिग बझार झाला. पण काँग्रेसची अवस्था तर महाआघाडीपेक्षाही बिकट झाली आहे. सत्तेच्या पहिल्या वर्षापासूनच काँग्रेसमध्ये दुफळी झाली आहे. उलट काँग्रेसचाच बिग बझार झाल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या छपराला आग लागेल, असे कुठल्याच काँगे्रस कार्यकर्त्यांना वाटले नव्हते. पण आता आग लागली असून, ती विझविण्यासाठी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांना लक्ष घालावे लागणार आहे. हुकूमशाही व मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्यांना चाप लावावा लागेल. अन्यथा महाआघाडीप्रमाणे काँग्रेसची बिघाडी होण्यास विलंब लागणार नाही. नगरसचिवांची कोंडीमहासभेत नगरसचिवांना मारहाण होण्याची पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना घडली. आजपर्यंत अधिकाऱ्यांचे डोळे काढण्यापर्यंत नगरसेवकांची मजल गेली होती, पण आता थेट हातघाईवरच प्रकरण आले आहे. यापूर्वी शहर अभियंता सी. जी. सोनावणे यांना मारहाण झाली होती. त्या प्रकरणात मदन पाटील यांनी नगरसेवकांची बाजू उचलून धरली. पण नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्या मारहाणीचे प्रकरण वेगळे आहे. नगरसेवक व माजी पदाधिकाऱ्यांचा आततायीपणा त्याला कारणीभूत आहे. त्यामागे नगरसचिवांकडून ठरावाच्या प्रती मिळत नसल्याचा राग स्पष्ट होत होता. ठराव दिले जाऊ नयेत, यासाठी महापौरांचा नगरसचिवांवर दबाव असतो, तर नगरसेवक ठरावासाठी आग्रही असतात. या दुहेरी कात्रीत सापडल्याने नगरसचिवांची कोंडी झाली आहे.