शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी -: जिगरबाजांची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 23:54 IST

कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे.

ठळक मुद्दे‘से नॉट टू प्लास्टिक’चा नारा, रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या साहसवीरांची यात्रा

सांगली : ‘से नॉट टू प्लास्टिक’ हा संदेश घेऊन कर्नाळ (ता. मिरज) येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या चार सायकलवीरांनी कर्नाळ ते कन्याकुमारी अशी साहसी १३६० किलो मीटरची अत्यंत रोमहर्षक सायकल सफर यशस्वी केली.ग्रुपचे सदस्य रावसाहेब मोहिते (वय ५९) संदेश कदम (५४), अमोल पाटील (३४) व राजू पाटील (४४) असे चौघेजण सायकलवरून, तर या चौघांना प्रोत्साहन व आवश्यक सेवा देण्यासाठी सहकारी म्हणून प्रभाकर आंबोळे (वय ६१) या मोहिमेत सहभागी झाले होते.

कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे. लांब पल्ल्याचा सायकल प्रवास ज्वलंत संदेश घेऊन करायचा, असा गु्रपचा संकल्प होता.त्यातूनच पर्यावरण वाचविण्यासाठी ‘से नॉट टू प्लास्टिक’ आणि ‘सायकल चालवा फिट राहा’ हे संदेश घेऊन कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी केला. दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता गावातील हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून सुरुवात झाली. गावातील शेकडो तरुण प्रोत्साहन देण्यासाठी सायकलवरून सांगलीच्या गणपती मंदिरापर्यंत आले. तिथून स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या चौघांनी पुढचा प्रवास सुरू केला.

लोकांशी संवाद साधत अत्यंत शिस्तबध्दपणे सायकलवीर प्रवास करत गेले. हत्तरगी (बेळगाव), शिग्गाव, चित्रदुर्ग, तुमकूर, होसूर, सेलम, वेदसुंदर (दिंडीगल), मदुराई, तिरुनेलवेल्ली असे नऊ मुक्काम त्यांनी केले आणि दहाव्यादिवशी सकाळी १२ वाजता कन्याकुमारी येथे पोहोचले. महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू या तीन राज्यांतून १३६० किलोमीटरचा सायकल प्रवास त्यांनी केला. अनेकांचा आत्मविश्वास वाढविणारा आणि सायकलिंगचे महत्त्व वाढविणारा हा प्रवास ठरला आहे.

विविध ठिकाणी सांगलीकरांनी केले स्वागतया सायकलपटूंचे कर्नाटक व तामिळनाडूतील महाराष्टयन लोकांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. त्यांच्या मोहिमेचे कौतुक केले. त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची सोय केली.

 

सायकल ग्रुप सुरू केल्यापासून गावातील अनेकजण सायकल चालवत आहेत. दर रविवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सायकलद्वारे भेटी देण्याचा उपक्रम पहिल्यांदा हाती घेतला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. गु्रपमधील काहीजणांचा मधुमेहाचा त्रास पूर्णपणे बरा झाला आहे. कर्नाळ ते कन्याकुमारी या प्रवासातून ‘प्लास्टिक वापरू नका’ संदेश आम्ही पोहोचविला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास आपण करू शकतो, हा आत्मविश्वास आला. खूपच सुखद, साहसी व प्रेरणादायी असा हा प्रवास होता.- राजू पाटील, कर्नाळ

 

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीSangliसांगली