शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी -: जिगरबाजांची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 23:54 IST

कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे.

ठळक मुद्दे‘से नॉट टू प्लास्टिक’चा नारा, रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या साहसवीरांची यात्रा

सांगली : ‘से नॉट टू प्लास्टिक’ हा संदेश घेऊन कर्नाळ (ता. मिरज) येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या चार सायकलवीरांनी कर्नाळ ते कन्याकुमारी अशी साहसी १३६० किलो मीटरची अत्यंत रोमहर्षक सायकल सफर यशस्वी केली.ग्रुपचे सदस्य रावसाहेब मोहिते (वय ५९) संदेश कदम (५४), अमोल पाटील (३४) व राजू पाटील (४४) असे चौघेजण सायकलवरून, तर या चौघांना प्रोत्साहन व आवश्यक सेवा देण्यासाठी सहकारी म्हणून प्रभाकर आंबोळे (वय ६१) या मोहिमेत सहभागी झाले होते.

कर्नाळ येथील रोड स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुप हा गेली दोन वर्षे ‘सायकल चालवा फिट राहा’ असा संदेश घेऊन दररोज सराव करत आहे. दर रविवारी सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा त्यांचा उपक्रम सुरू आहे. लांब पल्ल्याचा सायकल प्रवास ज्वलंत संदेश घेऊन करायचा, असा गु्रपचा संकल्प होता.त्यातूनच पर्यावरण वाचविण्यासाठी ‘से नॉट टू प्लास्टिक’ आणि ‘सायकल चालवा फिट राहा’ हे संदेश घेऊन कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी केला. दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता गावातील हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून सुरुवात झाली. गावातील शेकडो तरुण प्रोत्साहन देण्यासाठी सायकलवरून सांगलीच्या गणपती मंदिरापर्यंत आले. तिथून स्पिन वॉरियर्स सायकल ग्रुपच्या चौघांनी पुढचा प्रवास सुरू केला.

लोकांशी संवाद साधत अत्यंत शिस्तबध्दपणे सायकलवीर प्रवास करत गेले. हत्तरगी (बेळगाव), शिग्गाव, चित्रदुर्ग, तुमकूर, होसूर, सेलम, वेदसुंदर (दिंडीगल), मदुराई, तिरुनेलवेल्ली असे नऊ मुक्काम त्यांनी केले आणि दहाव्यादिवशी सकाळी १२ वाजता कन्याकुमारी येथे पोहोचले. महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू या तीन राज्यांतून १३६० किलोमीटरचा सायकल प्रवास त्यांनी केला. अनेकांचा आत्मविश्वास वाढविणारा आणि सायकलिंगचे महत्त्व वाढविणारा हा प्रवास ठरला आहे.

विविध ठिकाणी सांगलीकरांनी केले स्वागतया सायकलपटूंचे कर्नाटक व तामिळनाडूतील महाराष्टयन लोकांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. त्यांच्या मोहिमेचे कौतुक केले. त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची सोय केली.

 

सायकल ग्रुप सुरू केल्यापासून गावातील अनेकजण सायकल चालवत आहेत. दर रविवारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सायकलद्वारे भेटी देण्याचा उपक्रम पहिल्यांदा हाती घेतला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. गु्रपमधील काहीजणांचा मधुमेहाचा त्रास पूर्णपणे बरा झाला आहे. कर्नाळ ते कन्याकुमारी या प्रवासातून ‘प्लास्टिक वापरू नका’ संदेश आम्ही पोहोचविला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास आपण करू शकतो, हा आत्मविश्वास आला. खूपच सुखद, साहसी व प्रेरणादायी असा हा प्रवास होता.- राजू पाटील, कर्नाळ

 

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीSangliसांगली