शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आॅनलाईन नोंद नसणाऱ्या लाभार्थ्यांना धान्य नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:05 IST

दुकान उघडायला लावून धान्य वितरण सुरू केले. प्रकृती बरी नसल्याने दुकान बंद ठेवल्याचे दुकानदाराने सांगितले.शिधापत्रिकेद्वारे मिळणारा तांदूळ चांगल्या प्रतीचा आहे. गहू मात्र अस्वच्छ असल्याच्या तक्रारी काही लाभार्थ्यांनी केल्या.

सांगली : लॉकडाऊनमध्ये स्वस्त धान्य दुकानांतून मिळणाºया धान्याने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र वितरण प्रणालीसंदर्भात काही प्रमाणात तक्रारीही येत आहेत. शिधापत्रिकेत नावे असूनही आॅनलाईन नोंद नसल्याने काही कुटुंबे धान्यापासून वंचित राहत आहेत.

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या गरजूंच्या स्वस्त धान्य दुकानांसमोर रांगा लागत आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मिरजेत दोन तरुणांमध्ये हाणामारीही झाली. फक्त मास्क घालून लोक गर्दी करत आहेत. ती नियंत्रित करण्यासाठी दुकानदारांनी दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.

बामणोली (ता. मिरज) येथे धान्य भरल्यानंतरही दुकान उघडले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यानंतर पुरवठा विभागातील अधिकारी स्वत: तेथे गेले. दुकान उघडायला लावून धान्य वितरण सुरू केले. प्रकृती बरी नसल्याने दुकान बंद ठेवल्याचे दुकानदाराने सांगितले.शिधापत्रिकेद्वारे मिळणारा तांदूळ चांगल्या प्रतीचा आहे. गहू मात्र अस्वच्छ असल्याच्या तक्रारी काही लाभार्थ्यांनी केल्या.

सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी जिल्ह्यातील बैठक घेऊन रेशन दुकानदारांना सुरळीत वितरणाच्या सूचना दिल्या. गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा दिला. यावेळी रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, उपाध्यक्ष बाळासाहेब सदलगे यांच्यासह नगरसेवक संतोष पाटील, मदिना बारुदवाले, रोहिणी पाटील, मनगु सरगर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय