शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

प्रत्येक क्षेत्रात श्रेयवादाची लढाई : मकरंद अनासपुरे -जिल्हा टंचाईमुक्त करण्यावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:45 IST

सांगली : क्षेत्र कोणतेही असो, त्याठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत नाम फौंडेशन जनतेच्या सहभागातूनच जलसंधारणाच्या कामावर भर देत आहे.

सांगली : क्षेत्र कोणतेही असो, त्याठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत नाम फौंडेशन जनतेच्या सहभागातूनच जलसंधारणाच्या कामावर भर देत आहे. ‘नाम’ला कोणतेही श्रेय नको असून, आजवर झालेल्या कामाचे तमाम जनतेला श्रेय दिले पाहिजे. यापुढेही दुष्काळ मुक्तीसाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन नाम फौंडेशनचे संस्थापक, प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सोमवारी येथे केले.

जलसंधारणातील कामातील नाम फौंडेशनच्या योगदानाबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अनासपुरे पुढे म्हणाले की, जत, माण, आटपाडी तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी जे काम झाले आहे, त्यात तेथील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यात ‘नाम’ची भूमिका निमित्तमात्र आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन केलेल्या कामाचीच ही पोहोचपावती आहे. समाजात या ना त्या कारणाने कडवटपणा वाढत चालला असताना, गेल्या अडीच वर्षात ‘नाम’ने प्रभावी केले काम केले आहे.

शिवारे जलयुक्त करणे हेच एकमेव उद्दिष्ट असून कोणतेही राजकारण केले जाणार नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यात २० गावात कामाचे उद्दिष्ट होते. यंदा ५० गावात कामाचे नियोजन असून १३ कामे सुरू झाली आहेत.जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी याच दिवसात जिल्ह्यात १५१ टॅँकर सुरू होते. आता एकही टॅँकर नाही. यावरून वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या कामाची प्रचिती येते. आठवड्यातील दोन दिवस अधिकारी व कर्मचारी स्वत: काम करणार आहेत.यावेळी नाम फौंडेशनचे गणेश थोरात, अविनाश सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी, किरण कुलकर्णी, अश्विनी जिरंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.‘आभाळमाया’तर्फे निधीचा धनादेशजलयुक्तच्या कामासाठी येथील आभाळमाया फौंडेशनच्यावतीने जिल्हा प्रशासनास ८ लाख ८८ हजार ८८८ रूपयांच्या निधीचा धनादेश मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी म्हणजे तोफखानामकरंद अनासपुरे म्हणाले की, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहे. ते म्हणजे तोफखाना असून त्यांचा कामाचा धडाका यापूर्वीही अनुभवला आहे. जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत असल्याचा माझा अनुभव आहे.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरेSangliसांगली