शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सांगली जिल्ह्यातील बसाप्पाचीवाडी तलाव २२ वर्षांनी भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 15:41 IST

याचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित दुधाळ, शासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांनी दरवाजाची गळती तात्पुरती बंद केली.

ठळक मुद्दे आता निसर्गाच्या कृपेमुळे हा तलाव भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

डफळापूर : बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील मध्यम प्रकल्प तलाव तब्बल २२ वर्षांनी शंभर टक्के भरला. यामुळे तलावावर अवलंबून असलेल्या सात गावांतील शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

गत महिन्यात बसाप्पाचीवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे ओढ्यांचे प्रचंड प्रमाणात पाणी या तलावात येऊ लागले; परंतु या तलावाच्या मुख्य कालव्याच्या नादुरुस्त दरवाजामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. याबाबत जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला. याचे सविस्तर वृत्त लोकमतने दिले होते. यानंतर शिवसेना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित दुधाळ, शासकीय कर्मचारी, शेतकऱ्यांनी दरवाजाची गळती तात्पुरती बंद केली.

कवठेमहांकाळ व जत तालुक्याच्या सीमेवर बसाप्पाचीवाडी येथे मध्यम प्रकल्प मोठा तलाव आहे. या तलावावर बसाप्पाचीवाडी, अंकले, कोकळे, डोर्ली, मोघमवाडी, इरळी, डफळापूर आदी गावे अवलंबून आहेत. मागील उन्हाळ्यात म्हैसाळ योजनेच्या पाण्याअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. आता निसर्गाच्या कृपेमुळे हा तलाव भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस