शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

 विशेष व्याघ्र संवर्धन दलास केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा; मेळघाटला मंजुरी, चांदोलीबाबत दुजाभाव का?

By संतोष भिसे | Updated: November 19, 2023 17:30 IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी येथे चितळ सोडून त्याचे प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. याला यशही येत आहे. मात्र, या वाघांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे विशेष व्याघ्र संवर्धन दल येथे कार्यरत नाही. नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्राची गरज लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला. मेळघाट येथे हा फोर्स कार्यरत आहे मात्र चांदोली प्रकल्पात अद्याप नाही. या पथकास केंद्राकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. भविष्यात होणाऱ्या व्याघ्र पुनर्वसनाच्या दृष्टीने हे दल कार्यरत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

चांदोली व कोयना अभयारण्यातील ६९०.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रात शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित केला आहे. केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला तत्त्वतः मंजुरी दिल्यामुळे ताडोबा प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. यातील चार वाघ चांदोली, तर चार कोयना प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सह्याद्रीत वाघांची डरकाळी घुमणार आहे.२०१० मध्ये प्रथमच वन्यजीव विभागाने ट्रांझेट लाइन पद्धतीने केलेल्या व्याघ्र गणनेत प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रात सात, तर प्रकल्पाबाहेरील क्षेत्रात चार असे एकूण अकरा वाघांचे अस्तित्व असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये एका वाघाची छबी कॅमेऱ्यात टिपण्यात आली होती. केंद्राच्या व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ताडोबातील वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

मात्र, या वाघांच्या सुरक्षेसाठी असणारा स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स येथे आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला. या फोर्समध्ये १२० प्रशिक्षित वन कर्मचारी तसेच अधिकारी असतात. फोर्समुळे वन्यजीव विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या वाढून प्रकल्प क्षेत्रातील वाघांसह इतर प्राण्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. सध्या हा फोर्स मेळघाटला कार्यरत आहे, मात्र सह्याद्री अर्थात चांदोलीत अद्याप कार्यरत नाही. मंजुरी मिळूनही हा फोर्स कार्यरत नसल्यामुळे वन्यजीव कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडत आहे.

चितळ हे वाघाचे मुख्य खाद्य आहे. चांदोली जंगलात वाघ आणायचा तर त्याला चितळांची संख्या पुरेशी असणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने सागरेश्वर, कात्रज , आणि सोलापूर येथून चितळ आणून चांदोली जंगलात सोडण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी आठ हेक्टर क्षेत्राला कुंपण करून चितळांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. याला यशही येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीTigerवाघ