शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

लेखकांनी केवळ प्रश्न न मांडता उत्तरे शोधावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST

महादेववाडी (ता. वाळवा) : येथे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात बोलताना दि. बा. पाटील. शेजारी उद्‌घाटक नागेश पाटील, जगन्नाथ माळी, ...

महादेववाडी (ता. वाळवा) : येथे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात बोलताना दि. बा. पाटील. शेजारी उद्‌घाटक नागेश पाटील, जगन्नाथ माळी, अजिंक्य कुंभार आदी.

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : प्रबोधन, परिवर्तन हा साहित्याचा आत्मा असला पाहिजे, तरच ते साहित्य सकस मानता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी केले. नव्यांनी परखड लिहावे, बदलावर भाष्य करावे. लेखकांनी केवळ प्रश्न न मांडता प्रश्नांची उत्तरे शोधावीत, असे आवाहन त्यांनी केले.

महादेववाडी (ता. वाळवा) येथे तिसऱ्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन झाले. सभापती जगन्नाथ माळी, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, डी. जी. खोत, सरपंच सविता गिरीगोसावी, स्वागताध्यक्ष एच. एस. गिरीगोसावी प्रमुख उपस्थित होते.

अजिंक्य कुंभार म्हणाले, वाचणारी माणसे चांगले जगतात. तिळगंगा संमेलन भविष्यात मोठे होईल. चांगले लिखाण दर्जेदार वाचनातून येते. लेखन आनंद देते. उत्तम सावंत यांनी पुस्तकांचा परिचय सांगितला. गिरीगोसावी, एन. आर. मोहिते, राजाराम यादव यांची भाषणे झाली. मेहबूब जमादार यांनी स्वागत केले. आनंद हरी, वैशाली कोळी यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ माळी यांनी आभार मानले.

दुपार सत्रात कवींनी सादर केलेल्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. दीपक स्वामी, राहुल गौर यांच्या कवितांना उत्तम दाद मिळाली. सुनील नायकल यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. मोहिते, बी. डी. खोत, दिलीप गिरीगोसावी, राजाराम यादव, आनंद हरी, पंडित लोहार, उत्तम गुरव यांनी संयोजन केले.