शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

लेखकांनी केवळ प्रश्न न मांडता उत्तरे शोधावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST

महादेववाडी (ता. वाळवा) : येथे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात बोलताना दि. बा. पाटील. शेजारी उद्‌घाटक नागेश पाटील, जगन्नाथ माळी, ...

महादेववाडी (ता. वाळवा) : येथे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात बोलताना दि. बा. पाटील. शेजारी उद्‌घाटक नागेश पाटील, जगन्नाथ माळी, अजिंक्य कुंभार आदी.

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : प्रबोधन, परिवर्तन हा साहित्याचा आत्मा असला पाहिजे, तरच ते साहित्य सकस मानता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी केले. नव्यांनी परखड लिहावे, बदलावर भाष्य करावे. लेखकांनी केवळ प्रश्न न मांडता प्रश्नांची उत्तरे शोधावीत, असे आवाहन त्यांनी केले.

महादेववाडी (ता. वाळवा) येथे तिसऱ्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन झाले. सभापती जगन्नाथ माळी, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, डी. जी. खोत, सरपंच सविता गिरीगोसावी, स्वागताध्यक्ष एच. एस. गिरीगोसावी प्रमुख उपस्थित होते.

अजिंक्य कुंभार म्हणाले, वाचणारी माणसे चांगले जगतात. तिळगंगा संमेलन भविष्यात मोठे होईल. चांगले लिखाण दर्जेदार वाचनातून येते. लेखन आनंद देते. उत्तम सावंत यांनी पुस्तकांचा परिचय सांगितला. गिरीगोसावी, एन. आर. मोहिते, राजाराम यादव यांची भाषणे झाली. मेहबूब जमादार यांनी स्वागत केले. आनंद हरी, वैशाली कोळी यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ माळी यांनी आभार मानले.

दुपार सत्रात कवींनी सादर केलेल्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. दीपक स्वामी, राहुल गौर यांच्या कवितांना उत्तम दाद मिळाली. सुनील नायकल यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. मोहिते, बी. डी. खोत, दिलीप गिरीगोसावी, राजाराम यादव, आनंद हरी, पंडित लोहार, उत्तम गुरव यांनी संयोजन केले.