शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘अ‍ॅट्रॉसिटी’मुळे लोकशाहीचा मुडदा, भिडे गुरुजींचा आरोप : चौकशीला तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 03:56 IST

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा देशात गैरवापर सुरू आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा असावा की नको, हे मला माहीत नाही. पण लोकशाहीत जी मूल्ये आहेत, त्यांचा मुडदा पाडण्याचे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून एका गटाला आणि जमावाला दिले आहेत, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.

 सांगली - ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याचा देशात गैरवापर सुरू आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा असावा की नको, हे मला माहीत नाही. पण लोकशाहीत जी मूल्ये आहेत, त्यांचा मुडदा पाडण्याचे अधिकार या कायद्याच्या माध्यमातून एका गटाला आणि जमावाला दिले आहेत, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.भिडे म्हणाले, गेल्या तीन वर्षात मी वढू बुद्रुकला फिरकलेलो नाही. संभाजी महाराजांची समाधी आम्हाला श्रद्धा व स्फूर्ती देणारे स्थान आहे. कोरेगाव-भीमा येथील दंगलीबाबत माझ्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी साबळेवहिनी म्हणतात की, भिडे गुरुजींना दगड मारताना मी पाहिले आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे असतील, तर पोलिसांनी तपासून पाहावे, सत्य बाहेर येईल. प्रकाश आंबेडकर यांचा बोलविता धनी कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल करण्यासाठी माझे नाव घेण्यास आंबेडकरांना कोणी सांगितले, याचा उलगडा झाला पाहिजे. सर्व समाजाला कलंक लागेल, असा प्रकार सध्या सुरू आहे. अगदी राज्यसभा, लोकसभेपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. शासनस्तरावर तसेच सीबीआयने चौकशी करून सत्य बाहेर काढावे. मी दोषी असेन तर मला देहांताची शिक्षा द्यावी.सिंहासन गेलेल्या मंडळींचे कारस्थान?काही राजकारणी नेते माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून राजकीय फायदा उठविण्याचा डाव आखत आहेत. कर्जमाफीसाठी या मंडळींनी शेतकºयांचे आंदोलन पेटविले. शेतकºयांच्या बाजूने आंदोलन करणाºया नेत्यांनीही सरसकट कर्जमाफीची मागणी केली. पण यातील अनेक नेत्यांचा दोनशे-चारशे टन ऊस दरवर्षी जातो. या नेत्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी करताना काही विवेक आहे की नाही असेही भिडे म्हणाले.भिडेंना पोलीस संरक्षणकोरेगाव भीमा घटनेचे पडसाद सांगलीसह संपूर्ण राज्यभर उमटले असून, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यातील पाच पोलीस २४ तास त्यांच्या संरक्षणासाठी तैनात केले आहेत.ब्राह्मण महासंघाचा या प्रकरणाशी संबंध नाहीपुणे : कोरेगाव भीमा वादाच्या प्रकरणात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या वादाशी महासंघाचा काहीही संबंध नसून केवळ जातीय तेढ वाढविण्याचे हे षडयंत्र आहे, असा दावा महासंघाकडून करण्यात आला आहे. प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBhima-koregaonभीमा-कोरेगाव