शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

‘जिरवा जिरवी’च्या राजकारणात आटपाडीकरांचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:29 IST

अविनाश बाड लाेकमत न्युज नेटवर्क आटपाडी : आटपाडी तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी धनगाव येथून करण्यात आलेल्या योजनेचे ९५ टक्के काम ...

अविनाश बाड

लाेकमत न्युज नेटवर्क

आटपाडी

: आटपाडी तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी धनगाव येथून करण्यात आलेल्या योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ श्रेयावादासाठी आमदार अनिल बाबर यांनी योजनेचे काम बंद पाडल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केला. त्यांचा आरोपाचा व्हिडीओ तालुक्यात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या जिरवाजिरवीत तालुक्यातील सामान्य माणसांचा अकारण बळी जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आटपाडीतील संत सावता माळी मठात नुकताच एक सामाजिक कार्यक्रम झाला. यावेळी अमरसिंह देशमुख म्हणाले की, आटपाडी तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेल्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. भिवघाट येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण झाले आहे. कृष्णा नदीकाठीही कामही पूर्ण झाले आहे. योजनेची चाचणी घेण्यात आली आहे. मात्र, या योजनेचे श्रेय मला मिळेल आणि लोक माझे नाव घेतील, या कारणामुळे काही जणांनी योजनेचे काम बंद पाडले आहे. वास्तविक या योजनेचे पाणी मी एकटा पिणार नाही किंवा या योजनेचा मी ठेकेदारही नाही. त्यामुळे माझे एकट्याचे नुकसान होणार नाही. ही योजना झाली नाही तर संपूर्ण तालुक्याचे नुकसान होणार आहे. टेंभू योजनेचे पाणी तालुक्यात आले असले, तरी हे पाणी शेतीसाठी आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. विटेकरांना जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून पाणी दिले जाते, तर आटपाडी तालुक्यातील जनतेने शुद्ध पाणी प्यायचे नाही का? असा सवाल देशमुख यांनी केला.

देशमुख यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, यावर आमदार बाबर यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. देशमुख यांनी थेट आमदार बाबर यांचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा एकूणच रोख बाबर यांच्याविरुद्ध होता.

चौकट

आटपाडीकर पितात विकतचे पाणी

सध्या आटपाडीसह तालुक्यात शुद्ध पाणी विकणारे अनेक उद्योग निर्माण झाले आहेत. टेम्पोने शुद्ध पाणी विकले जात आहे. त्यामुळे पिण्यासाठी लोकांना पदरमोड करावी लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांचे धनगाव योजनेकडे लक्ष आहे. पण राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे योजना कधी पूर्ण होणार, याबद्दल संभ्रम आहे.

कोट

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना मी पूर्ण ताकद लावून ही योजना मंजूर करून आणली. तेव्हा तालुक्यात टँकर भरण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध नव्हते. पण मला श्रेय मिळेल, या भीतीने काहींनी योजना बंद पाडली आहे. मात्र मी स्वस्थ बसणार नाही. गेल्यावर्षीच योजना पूर्ण होऊन पाणी मिळाले असते. आणखी काही काळ जाईल, पण मी पूर्ण प्रयत्न करून योजना पूर्ण करणारच.

- अमरसिंह देशमुख

माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सांगली