शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत कर्मचारी संपावर, पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गावात कचऱ्याचे ढीग साठले ...

आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गावात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. या आंदोलनामुळे गावाला वेठीस धरू नये, असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे. दरम्यान, आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.

पगारवाढीच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे ४५ कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे आधीच चार ते पाच दिवसांतून एकदा मिळणारे पाणी आता बंदच झाले आहे. याआधीही गेल्या दिवाळीत कर्मचारी संपावर गेले होते. आटपाडी ग्रामपंचायतीत आकृतीबंधाबाहेरील कर्मचाऱ्यांना यापूर्वी दरवर्षाला ५०० रुपये पगारवाढ होत होती. जुलै २०१८पासूनच्या कार्यकाळात फेब्रुवारी २०१९च्या पगारात ५२५ रुपयांची वाढ केली, त्यानंतर ऑक्टोबर २०१९, जुलै २०२० व आता जून २०२१मध्ये प्रत्येकी ५०० रुपये वाढ अशा तीन वर्षांमध्ये चारवेळा पगारात वाढ केली, म्हणजेच एका कर्मचाऱ्याला २०२५ रुपये पगारवाढ करुनही पगारवाढ केलीच नाही, असे म्हणून कर्मचाऱ्यांनी सोमवार, दि. ५ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारुन गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे.

दिवसाला कमीतकमी ५०० ते ७०० रुपये मिळालेच पाहिजेत, या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे कारभारी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या ३५ टक्केपेक्षा जास्त खर्च पगारावर व प्रशासन खर्चावर करता येत नाही, तरीही सध्या पन्नास टक्के खर्च होत आहे. यापेक्षा जादा पगारवाढ करता येत नाही, असे समजावून सांगूनदेखील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे.

गुरुवारी आकृतीबंधामधील पाच कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. हंगामी कामगारांची नेमणूक करून गावचा पाणी पुरवठा उद्यापासून सुरू होईल, असे सरपंच पाटील यांनी सांगितले.

चौकट

आटपाडीबाहेरचे कामगार नेमणार

हे काम बंद आंदोलन करणाऱ्या कामगारांना सध्या कोरोनामुळे आपत्तीच्या काळात आंदोलन करता येणार नाही. कामावर हजर व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. याशिवाय म्हसवड, सोलापूर आणि कोरेगाव येथील खासगी कंपन्यांकडून कर्मचारी नियुक्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती सरपंच पाटील यांनी दिली.