शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत कर्मचारी संपावर, पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गावात कचऱ्याचे ढीग साठले ...

आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गावात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. या आंदोलनामुळे गावाला वेठीस धरू नये, असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे. दरम्यान, आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.

पगारवाढीच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे ४५ कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे आधीच चार ते पाच दिवसांतून एकदा मिळणारे पाणी आता बंदच झाले आहे. याआधीही गेल्या दिवाळीत कर्मचारी संपावर गेले होते. आटपाडी ग्रामपंचायतीत आकृतीबंधाबाहेरील कर्मचाऱ्यांना यापूर्वी दरवर्षाला ५०० रुपये पगारवाढ होत होती. जुलै २०१८पासूनच्या कार्यकाळात फेब्रुवारी २०१९च्या पगारात ५२५ रुपयांची वाढ केली, त्यानंतर ऑक्टोबर २०१९, जुलै २०२० व आता जून २०२१मध्ये प्रत्येकी ५०० रुपये वाढ अशा तीन वर्षांमध्ये चारवेळा पगारात वाढ केली, म्हणजेच एका कर्मचाऱ्याला २०२५ रुपये पगारवाढ करुनही पगारवाढ केलीच नाही, असे म्हणून कर्मचाऱ्यांनी सोमवार, दि. ५ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारुन गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे.

दिवसाला कमीतकमी ५०० ते ७०० रुपये मिळालेच पाहिजेत, या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे कारभारी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या ३५ टक्केपेक्षा जास्त खर्च पगारावर व प्रशासन खर्चावर करता येत नाही, तरीही सध्या पन्नास टक्के खर्च होत आहे. यापेक्षा जादा पगारवाढ करता येत नाही, असे समजावून सांगूनदेखील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे.

गुरुवारी आकृतीबंधामधील पाच कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. हंगामी कामगारांची नेमणूक करून गावचा पाणी पुरवठा उद्यापासून सुरू होईल, असे सरपंच पाटील यांनी सांगितले.

चौकट

आटपाडीबाहेरचे कामगार नेमणार

हे काम बंद आंदोलन करणाऱ्या कामगारांना सध्या कोरोनामुळे आपत्तीच्या काळात आंदोलन करता येणार नाही. कामावर हजर व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. याशिवाय म्हसवड, सोलापूर आणि कोरेगाव येथील खासगी कंपन्यांकडून कर्मचारी नियुक्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती सरपंच पाटील यांनी दिली.