शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी २३ वेळा दुष्काळाच्या फेऱ्यात; निसर्गाच्या सततच्या अवकृपेने दुष्काळग्रस्त हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:53 IST

माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे.

ठळक मुद्दे दुष्काळी स्थिती गंभीर : सरासरीइतकाही पाऊस नाही

अविनाश बाड ।

आटपाडी : आटपाडी तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५५ मिलिमीटर एवढे आहे. निसर्गाच्या अवकृपेचा कहर म्हणजे, ज्या १९६५ मध्ये आटपाडी तालुक्याची निर्मिती झाली, तेव्हाही दुष्काळ पडला होता. त्यावर्षी ३२६ मि.मी. पाऊस पडला. १९५३ पासून आतापर्यंत एकूण २३ वर्षे तालुक्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. तालुका स्वतंत्र होण्यापूर्वी खानापूर तालुक्यात समावेश होता. आटपाडीच्या पावसाची आकडेवारी १९५३ पासूनची उपलब्ध आहे. त्यामध्ये तालुका वारंवार दुष्काळाला सामोरा गेल्याचे स्पष्ट होते; पण हा भाग काही अलीकडेच दुष्काळाला सामोरा जातोय अशातला भाग नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी हा भाग औंध संस्थानचा भाग होता. १९३८ मध्ये लेंगरेवाडी येथे शाळेत शिक्षक म्हणून गेल्यानंतर दुष्काळ पडतो आणि स्थलांतरित झालेल्या रिकाम्या गावातून शिक्षक बाहेर पडतो. माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे. गेल्या ६५ वर्षांत ८० च्या दशकानंतर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे प्रमाण खूपच वाढले आहे. १९७२ चा दुष्काळ अनुभवलेल्या आटपाडीकरांना पुढे सतत भंडावून सोडले आहे. १९८१ ते १९९० या दहा वर्षांत तब्बल ६ वर्षे तालुक्यात दुष्काळाने ठाण मांडले. १९८२ ते १९८६ सलग ५ वर्षे ३५५ मि.मी.पेक्षा तालुक्यात कमी पाऊस झाला. १९९० मध्ये आटपाडीत २८६ मि.मी. एवढाच पाऊस झाला. त्यावर्षी खरसुंडीत ४७२ मि.मी. पाऊस झाला.

आकडेवारीच्या सरासरीत त्यावर्षी ३७९ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद असली, तरी त्याचा आटपाडी परिसरावरील दुष्काळाची दाहकता काही कमी होणार नाही. १९९१ ते २००० या दशकात तब्बल ५ वर्षे दुष्काळाची गेली. त्यात १९९१ आणि १९९२ ही सलग दोन वर्षे त्यानंतर एक वर्ष मध्ये गेले की लगेच १९९४ मध्ये सरासरीपेक्षा १११ मि.मी. पाऊस कमी पडला. पुन्हा २ वर्षांनी १९९७ मध्ये व २००० मध्ये दुष्काळी परिस्थितीने लोकांचे हाल केले.वाळवंटापेक्षा : कमी पाऊस!अरवली पर्वताने राजस्थानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. पश्चिम राजस्थानात थर वाळवंट आहे. तिथले सरासरी पर्जन्यमान त्याच्याहून कमी म्हणजे ३५५ मि.मी. एवढे आहे. फक्त वाळवंटात वर्षभर तापमान अधिक असते. हाच काय तो फरक. पण वाईट म्हणजे आटपाडी तालुक्यात ३५५ मि.मी. एवढाही पाऊस होत नाही. या पावसाच्या नोंदी शासनदरबारी असूनही, २३ वर्षांपैकी फक्त ४ वर्षे टंचाईसदृश स्थिती आणि दुष्काळ जाहीर करण्यात आला.२००१ ते २०१० या दशकात सलग ६ वर्षे दुष्काळ पडला.२००१ ते २००६ : पर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शासनदरबारी फक्त १९७२ आणि २००३ च्या दुष्काळात उपाययोजना करुन त्याची नोंद केली आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी