शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी २३ वेळा दुष्काळाच्या फेऱ्यात; निसर्गाच्या सततच्या अवकृपेने दुष्काळग्रस्त हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:53 IST

माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे.

ठळक मुद्दे दुष्काळी स्थिती गंभीर : सरासरीइतकाही पाऊस नाही

अविनाश बाड ।

आटपाडी : आटपाडी तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५५ मिलिमीटर एवढे आहे. निसर्गाच्या अवकृपेचा कहर म्हणजे, ज्या १९६५ मध्ये आटपाडी तालुक्याची निर्मिती झाली, तेव्हाही दुष्काळ पडला होता. त्यावर्षी ३२६ मि.मी. पाऊस पडला. १९५३ पासून आतापर्यंत एकूण २३ वर्षे तालुक्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. तालुका स्वतंत्र होण्यापूर्वी खानापूर तालुक्यात समावेश होता. आटपाडीच्या पावसाची आकडेवारी १९५३ पासूनची उपलब्ध आहे. त्यामध्ये तालुका वारंवार दुष्काळाला सामोरा गेल्याचे स्पष्ट होते; पण हा भाग काही अलीकडेच दुष्काळाला सामोरा जातोय अशातला भाग नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी हा भाग औंध संस्थानचा भाग होता. १९३८ मध्ये लेंगरेवाडी येथे शाळेत शिक्षक म्हणून गेल्यानंतर दुष्काळ पडतो आणि स्थलांतरित झालेल्या रिकाम्या गावातून शिक्षक बाहेर पडतो. माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे. गेल्या ६५ वर्षांत ८० च्या दशकानंतर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे प्रमाण खूपच वाढले आहे. १९७२ चा दुष्काळ अनुभवलेल्या आटपाडीकरांना पुढे सतत भंडावून सोडले आहे. १९८१ ते १९९० या दहा वर्षांत तब्बल ६ वर्षे तालुक्यात दुष्काळाने ठाण मांडले. १९८२ ते १९८६ सलग ५ वर्षे ३५५ मि.मी.पेक्षा तालुक्यात कमी पाऊस झाला. १९९० मध्ये आटपाडीत २८६ मि.मी. एवढाच पाऊस झाला. त्यावर्षी खरसुंडीत ४७२ मि.मी. पाऊस झाला.

आकडेवारीच्या सरासरीत त्यावर्षी ३७९ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद असली, तरी त्याचा आटपाडी परिसरावरील दुष्काळाची दाहकता काही कमी होणार नाही. १९९१ ते २००० या दशकात तब्बल ५ वर्षे दुष्काळाची गेली. त्यात १९९१ आणि १९९२ ही सलग दोन वर्षे त्यानंतर एक वर्ष मध्ये गेले की लगेच १९९४ मध्ये सरासरीपेक्षा १११ मि.मी. पाऊस कमी पडला. पुन्हा २ वर्षांनी १९९७ मध्ये व २००० मध्ये दुष्काळी परिस्थितीने लोकांचे हाल केले.वाळवंटापेक्षा : कमी पाऊस!अरवली पर्वताने राजस्थानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. पश्चिम राजस्थानात थर वाळवंट आहे. तिथले सरासरी पर्जन्यमान त्याच्याहून कमी म्हणजे ३५५ मि.मी. एवढे आहे. फक्त वाळवंटात वर्षभर तापमान अधिक असते. हाच काय तो फरक. पण वाईट म्हणजे आटपाडी तालुक्यात ३५५ मि.मी. एवढाही पाऊस होत नाही. या पावसाच्या नोंदी शासनदरबारी असूनही, २३ वर्षांपैकी फक्त ४ वर्षे टंचाईसदृश स्थिती आणि दुष्काळ जाहीर करण्यात आला.२००१ ते २०१० या दशकात सलग ६ वर्षे दुष्काळ पडला.२००१ ते २००६ : पर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शासनदरबारी फक्त १९७२ आणि २००३ च्या दुष्काळात उपाययोजना करुन त्याची नोंद केली आहे. 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी