शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पोलिस पाटील भरतीला ‘अर्थ’पूर्ण तडजोडीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:40 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली असतानाच यातील ‘अर्थ’पूर्ण घडामोडींची चर्चा दोन्ही तालुक्यात रंगली आहे. कापूसखेडपाठोपाठ आता शिराळा तालुक्यातील पाडळीवाडी, तडवळे येथील महिलांनीही भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे केली आहे. यामुळे या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याची ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली असतानाच यातील ‘अर्थ’पूर्ण घडामोडींची चर्चा दोन्ही तालुक्यात रंगली आहे. कापूसखेडपाठोपाठ आता शिराळा तालुक्यातील पाडळीवाडी, तडवळे येथील महिलांनीही भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे केली आहे. यामुळे या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे चित्र आहे. शेतकरी चळवळतील नेत्याच्या काही बगलबच्च्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.‘वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिस पाटील भरती संशयाच्या भोवºयात’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त प्रसिध्द होताच या भरतीसाठी ‘अर्थ’पूर्ण तडजोडी झाल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. कापूसखेड (ता. वाळवा) येथील नामदेव महादेव माने यांनी पोलिस पाटील भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपूनही कापूसखेड येथील उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्याचा आरोप केला आहे. यासाठी संबंधित उमेदवाराने शेतकरी चळवळीतील एका नेत्याची शिफारस घेऊन हे पदही पदरात पाडून घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. न्याय मिळाला नाही, तर बुधवार, दि. २० रोजी प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा माने यांनी दिला आहे.माने यांच्या तक्रारीनंतर ‘लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द केले होते. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अन्याय झालेल्या इतरांनीही थेट ‘लोकमत’शी संपर्क साधला आहे. शिराळा तालुक्यातील पाडळीवाडी येथील सौ. उषा बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या तक्रारवजा निवेदनात म्हटले आहे की, पाडळीवाडी येथील पोलिस पाटील पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. मी या पदासाठी सर्व निकषात बसत होते. यासाठी मी रितसर अर्ज करुन परीक्षाही दिली होती. तसेच तोंडी परीक्षाही चांगली गेली होती. असे असतानाही राजकीय दबावाला बळी पडून प्रांताधिकाºयांनी पात्र नसलेल्या उमेदवाराला पोलिस पाटील पदाची नेमणूक दिली आहे. या प्रक्रियेत गैरकारभार झाला असून, याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. याच्या प्रती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील, विभागीय आयुक्त पुणे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना देण्यात आल्या आहेत.तडवळे (ता. शिराळा) येथील श्रीमती अनुराधा आकाराम पाटील यांनीही या भरती प्रक्रियेत आपल्यावर अन्याय झाल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे शिक्षण एम. ए. पर्यंत झाले आहे. पोलिस पाटील पदासाठी अर्ज केला होता. लेखी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. मुलाखतीसाठी बोलावणे आले होते. मुलाखतसुद्धा चांगली झाली. परंतु ज्यांचे शिक्षण जेम-तेम आहे, लिहिता- वाचता येत नाही, अशा वैशाली सुभाष पाटील यांची चुकीच्या पध्दतीने निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोठा गैरकारभार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रक्रियेची चौकशी होऊन निवड झालेल्या वैशाली पाटील यांचे पद रद्द करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.या प्रक्रियेतील गैरकारभाराची व्याप्ती वाढू लागली असून, शेतकरी चळवळीतील नेत्यासह त्याच्या बगलबच्च्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली गतिमान केल्याचेही समजते. तक्रारींची संख्या वाढत असल्याने याबाबतची दखल प्रशासनाला घेणे भाग पडत असल्याचे चित्र आहे.मोबाईल कॉल : नोंदी तपासा..!या भरती प्रक्रियेत अन्याय झालेल्या पाडळीवाडी येथील उषा बाबासाहेब पाटील यांनी भरती प्रक्रिया कालावधीतील निवड झालेले उमेदवार, शासकीय अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीवरील कॉल नोंदी तपासाव्यात. म्हणजे खरे काय ते स्पष्ट होईल, अशीही मागणी आपल्या तक्रार अर्जात केली आहे.पोलिस पाटील भरतीसाठी आपण प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्याकडे काहींची शिफारस केली. परंतु जाधव यांनी ही भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसारच केली जाणार असल्याचे सांगितले. एका शेतकरी चळवळतीतील नेत्याच्या बगलबच्च्यांनी यामध्ये अर्थपूर्ण हस्तक्षेप केल्याचे ‘लोकमत’मुळे स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही.- राजू शेट्टी, खासदार.वाळवा-शिराळ्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रियेत झालेल्या गैरकारभाराची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींचा विचार करुन संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- जयंत पाटील, आमदार.