शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकरांनी व्यक्त केला विश्वास

By श्रीनिवास नागे | Updated: February 24, 2023 18:19 IST

मिरजेत १७वे कामगार साहित्य संमेलन

मिरज : यंत्र असो, तंत्र असो, कृत्रिम बुध्दिमत्ता असो, तिचा निर्माता, सृजनात्मा माणूसच आहे. कृत्रिम बुध्दीलाही माणसांनीच निर्माण केले आहे. माणसामधली सृजनशक्ती आहे, तोपर्यंत त्याची कृतीही असणार आहे, त्याची कलाही असणार आहे, त्याचे साहित्यही असणार आहे आणि माणूसही असणार आहे, असा ‍विश्वास सतराव्या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत मिरजेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्यनगरी बालगंधर्व नाट्यमंदिरात आयोजित १७व्या कामगार साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा भवाळकर, कामगारमंत्री सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.भवाळकर म्हणाल्या, नवभान आलेला कामगार साहित्यिक, भांडवलशाहीचे नवे अर्थभान घेऊन लिहू-वाचू लागला. मोर्चांमुळे कामगार चळवळीचे अस्तित्व समाजाला जाणवू लागले. त्याचा आविष्कार त्याच्या लेखनातून होऊ लागला. नवयुगाच्या विविध चळवळींतून कामगार चळवळ पुढे येत गेली. त्या त्या गटातल्या साहित्याची निर्मिती त्यातून झाली.

साहित्य, कामगारांच्या साहित्यातून श्रमाचा हुंकार बाहेर पडतो. गिरण्या कारखान्यातल्या एकाच प्रकारच्या अनुभवी संघभावनेने कामगाराला नवी दृष्टी दिली व नवं भान दिलं. नवी अस्मिता, अभिमान आणि विश्वास दिला. यंत्रयुगातल्या एकानुभवी समूहाला कष्टाचंही सामूहिक एकीकरण झालं. नवयुगाचं अर्थकारण मालक - मजूर संबंध, संघर्ष, मजुरांचे हक्क आदी बाबींमधून नवभान आलेला कामगारवर्ग निर्माण झाला.बुद्धी व श्रम ही दोन्ही बले जेव्हा एकत्र येतात तेव्हा नवनिर्मिती होते. मनगट, मन आणि बुद्धी एकत्र आल्याशिवाय प्रगती नाही म्हणूनच श्रमातून सौंदर्य निर्माण करणाऱ्या कामगारांना समाजात आदराचे स्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक डॉ. राजा दीक्षित यांनी केले.कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जात असून, कबड्डीसारख्या राज्यस्तरीय स्पर्धाही घेतल्या जात आहेत.अभिनेत्री रोहिणी कुडेकर, संबळवादक गौरी वायचळ, अभिनेता अजितकुमार कोष्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उपसचिव दादासाहेब खताळ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली