शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

वेरळा विकास संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुली डॉ. जाई व वसुंधरा असा परिवार आहे.

कवठेपिरानमध्ये जन्मलेल्या अरुण चव्हाण यांनी शिक्षणानंतर काही काळ औरंगाबादला डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात व कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून काम केले होते. त्यानंतर सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. यादरम्यान, खानापूर तालुक्यातील दुष्काळी शेतीशी त्यांचा संपर्क आला. पावसाअभावी नुकसानीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेतून वेरळा विकास संस्थेची स्थापना केली. स्वयंसेवी संस्थेची संकल्पना फारशी अस्तित्वात नसल्याच्या काळात म्हणजे २ ऑक्टोबर १९६९ रोजी वेरळा संस्थेचा शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रवास सुरू झाला. या प्रवासात त्यांना सदुभाऊ गुळवणी, भगवानराव सव्वाशे, धोंडिराम जाधव, रामतात्या जाधव यांची साथ मिळाली.

संस्थेने शेतकऱ्यांसाठी ३७ नाला बंधारे, दोन पाझर तलाव, १०४ एकर क्षेत्रात वनीकरण, रस्ते, शाळा अशी कामे उभी केली. देशिंग व खरशिंग परिसरात वनीकरण, कवठेपिरानला क्षारपड विकास असे प्रकल्प राबवले. शालाबाह्य मुलांसाठी घरबांधणी प्रशिक्षण केंद्र, महिला व मुलींसाठी वेगवेगळे प्रकल्प, आरोग्यासाठीची कामे चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून केली आहेत. एडस्‌ग्रस्तांसाठीही त्यांनी अनेक वर्षे काम केले.

संस्थेच्या कामांमुळे आळसंद, वाझर, कमळापूर, खानापूर आदी भागात हिरवाई फुलली आहे. कृषिभूषण प्र. शं. ठाकूर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.