शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 14:55 IST

Highway Sangli : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भूसंपादनकामी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे चार वर्षांपासून विचाराधीन असणारा विषय यामुळे मार्गी लागला आहे. लवाद निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्तीलवाद निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनाही मिळाला दिलासा

संतोष भिसेसांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या भूसंपादनकामी लवाद म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे चार वर्षांपासून विचाराधीन असणारा विषय यामुळे मार्गी लागला आहे. लवाद निश्चित झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.लवाद नियुक्तीसाठी शेतकरी पाठपुरावा करत होते. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लवाद म्हणून नियुक्तीचे केंद्र सरकारचे नियोजन होते, पण सध्या सांगलीत हे पद रिक्त असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. रत्नागिरी - नागपूर महामार्ग क्रमांक १६६ च्या भूसंपादनविषयी सांगली जिल्ह्याच्या सीमेत लवाद म्हणून निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

जिल्ह्यात मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतील २६ गावांतून महामार्ग जातो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ३०५ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सोलापूर या चार जिल्ह्यांत भूसंपादनापोटी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. एकट्या सांगली जिल्ह्यात ९७१ कोटींहून अधिक भरपाई दिली जात आहे.

रेडी रेकनरपेक्षा पाचपटींपर्यंत भरपाई मिळत आहे. शिवाय घरे, झाडे, बागायती, विहीर, कूपनलिका आदींसाठीही भरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना मुल्यांकन मान्य नाही. त्यांनी महामार्गाच्या कामासाठी जमिनी दिल्या असल्या तरी भरपाईचे पैसे स्वीकारलेले नाहीत. काहींनी पैसे स्वीकारले तरी कायदेशीर दाद मागण्याचा हक्क राखून ठेवला आहे.या शेतकऱ्यांना आता लवादापुढे दाद मागता येईल. गेली तीन-चार वर्षे लवाद अस्तित्वात नसल्याने दाद मागता आलेली नव्हती. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे बाजू मांडता येईल. जमिनींचे मुल्यांकन चुकीचे केल्याची सर्वांची मुख्य तक्रार आहे. 

केंद्र सरकारने लवादाची नियुक्ती केल्याने शेतकऱ्यांना आता दाद मागता येईल. महामार्ग भूसंपादनावेळी कमी मुल्यांकनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना न्याय मिळेल. लवाद नियुक्तीसाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता, त्याला यश आले आहे. शासनाने लवादाची प्रत्यक्ष कार्यवाही तातडीने सुरु करावी.- महेश सलगरे,महामार्गबाधित शेतकऱ्यांची कृती समिती.

टॅग्स :highwayमहामार्गSangliसांगलीkonkanकोकण