शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, २३ जूनला परीक्षा; ६ मेपर्यंत अर्जाची मुदत

By अविनाश कोळी | Updated: April 22, 2024 21:20 IST

देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेतली जाणारी नीट पीजी ही एकमेव परीक्षा आहे. ८०० गुणांची नीट पीजी परीक्षा संगणक आधारित असून दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाईल.

सांगली : एमबीबीएस पदवीधारकांसाठी विविध विषयातील पदव्युत्तर एम. डी., एम. एस., डी. एन. बी. आणि पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेससाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट पीजी’च्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ६ मे २०२४ पर्यंत अर्जाची मुदत असून २३ जून रोजी परीक्षा होणार आहे.

देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेतली जाणारी नीट पीजी ही एकमेव परीक्षा आहे. ८०० गुणांची नीट पीजी परीक्षा संगणक आधारित असून दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना २६ मे ते ३ जून या कालावधीत अर्जातील त्रुटी असल्यास त्यात बदल करता येईल. १७ जून २०२४ रोजी प्रवेशपत्र उपलब्ध केली जातील.

परीक्षेचा निकाल १५ जुलै २०२४ रोजी घोषित होणार आहे. एमबीबीएस बरोबरच आयुष कोर्सेससाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी आखिल भारतीय पदव्युत्तर आयुष प्रवेश प्रक्रिया म्हणजेच एआयएपीजीईटी या परीक्षेचे वेळापत्रकही घोषित झाले असून पदव्युत्तर आयुष कोर्सेससाठी १५ मे रोजी रात्री ११:५० पर्यंत विद्यार्थांना अर्ज करता येतील. १७ मे ते १९ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी मिळेल. २ जुलै २०२४ रोजी प्रवेश पत्र उपलब्ध केली जातील. आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी या शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा दि. ६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

आयुषची परीक्षा ९७ केंद्रांवरआयुष कोर्सेससाठीची परीक्षा देशभरातील ९७ शहरातील वेगवेगळ्या केंद्रावर ६ जुलै रोजी घेतली जाणार आहे. आयुष कोर्सेसनंतर ३० जून २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.

नीट-पीजीची परीक्षा देशभरातील २५९ केंद्रावर एकाच दिवशी व एकाचवेळी २२ जूनला होणार आहे. एमबीबीएस नंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. एमबीबीएस नंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. देशपातळीवरील तसेच राज्यपातळीवरील सर्व पदव्युत्तर जागांवरील प्रवेश हे या प्रवेश परीक्षेच्या गुणांवरच होतात. त्यामुळे या परीक्षेला अत्यंत महत्त्व आहे.

- डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :Educationशिक्षणdoctorडॉक्टरStudentविद्यार्थी