शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू, २३ जूनला परीक्षा; ६ मेपर्यंत अर्जाची मुदत

By अविनाश कोळी | Updated: April 22, 2024 21:20 IST

देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेतली जाणारी नीट पीजी ही एकमेव परीक्षा आहे. ८०० गुणांची नीट पीजी परीक्षा संगणक आधारित असून दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाईल.

सांगली : एमबीबीएस पदवीधारकांसाठी विविध विषयातील पदव्युत्तर एम. डी., एम. एस., डी. एन. बी. आणि पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेससाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट पीजी’च्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ६ मे २०२४ पर्यंत अर्जाची मुदत असून २३ जून रोजी परीक्षा होणार आहे.

देशभरातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे घेतली जाणारी नीट पीजी ही एकमेव परीक्षा आहे. ८०० गुणांची नीट पीजी परीक्षा संगणक आधारित असून दि. २३ जून २०२४ रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत ही परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांना २६ मे ते ३ जून या कालावधीत अर्जातील त्रुटी असल्यास त्यात बदल करता येईल. १७ जून २०२४ रोजी प्रवेशपत्र उपलब्ध केली जातील.

परीक्षेचा निकाल १५ जुलै २०२४ रोजी घोषित होणार आहे. एमबीबीएस बरोबरच आयुष कोर्सेससाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी आखिल भारतीय पदव्युत्तर आयुष प्रवेश प्रक्रिया म्हणजेच एआयएपीजीईटी या परीक्षेचे वेळापत्रकही घोषित झाले असून पदव्युत्तर आयुष कोर्सेससाठी १५ मे रोजी रात्री ११:५० पर्यंत विद्यार्थांना अर्ज करता येतील. १७ मे ते १९ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी मिळेल. २ जुलै २०२४ रोजी प्रवेश पत्र उपलब्ध केली जातील. आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि युनानी या शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा दि. ६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

आयुषची परीक्षा ९७ केंद्रांवरआयुष कोर्सेससाठीची परीक्षा देशभरातील ९७ शहरातील वेगवेगळ्या केंद्रावर ६ जुलै रोजी घेतली जाणार आहे. आयुष कोर्सेसनंतर ३० जून २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.

नीट-पीजीची परीक्षा देशभरातील २५९ केंद्रावर एकाच दिवशी व एकाचवेळी २२ जूनला होणार आहे. एमबीबीएस नंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. एमबीबीएस नंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. देशपातळीवरील तसेच राज्यपातळीवरील सर्व पदव्युत्तर जागांवरील प्रवेश हे या प्रवेश परीक्षेच्या गुणांवरच होतात. त्यामुळे या परीक्षेला अत्यंत महत्त्व आहे.

- डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :Educationशिक्षणdoctorडॉक्टरStudentविद्यार्थी