शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

लग्नपत्रिकेच्या धर्तीवर मतदारराजाला आवाहन

By admin | Updated: September 17, 2014 23:04 IST

यासाठी प्रशासनही या धामधुमीत मागे नाही. लोकसभा निवडणुकीवेळी प्रशासनाचा यामधला सहभाग चांगलाच चर्चेचा ठरला

तासगाव : लोकशाहीने तमाम भारतीयांना मतदानाचा समान अधिकार प्राप्त करून दिला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, यासाठी आता प्रशासनानेही कंबर कसली आहे. लग्नपत्रिकेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली आवाहन पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार मतदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. एव्हाना ते प्रयत्न सुरूही झाले आहेत. परंतु निवडणूक, मतदानाचा हक्क व लोकशाही तळागाळात पोहोचली पाहिजे, यासाठी प्रशासनही या धामधुमीत मागे नाही. लोकसभा निवडणुकीवेळी प्रशासनाचा यामधला सहभाग चांगलाच चर्चेचा ठरला होता. लोकांनी मतदान केले पाहिजे, हा त्यामागचा हेतू सुस्पष्ट आहे.तासगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर सध्या एक पत्रिका झळकत आहे. इमारतीत जाताना सामान्य माणूस ही पत्रिका वाचल्याशिवाय पुढे जात नाही. ही पत्रिका आहे, १५ आॅक्टोबरच्या मुहूर्ताची. या मंगलप्रसंगी मतदान करून निवडणूक कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे. आपापल्या गावातील मतदान केंद्र हे स्थळ आहे. विशेष म्हणजे ‘आहेर स्वीकारू नये’ची टीप या पत्रिकेत आवर्जून घालण्यात आली आहे. (वार्ताहर)