शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:38 IST

तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने पिके पूर्ण वाया गेली आहेत.

ठळक मुद्देतालुका काँग्रेसची मागणी-तहसील कार्यालयावर मोर्चा

कवठेमहांकाळ : तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने पिके पूर्ण वाया गेली आहेत. शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट असताना, शासनाने कोणत्याही प्रकारची बियाणे, खते याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले नाही. शासनाने फेरसर्वेक्षण करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात म्हैसाळ व टेंभू योजनेचे पाणी सोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील पाझर तलाव, लघुपाटबंधारे तलाव, तसेच अग्रणी नदीवरील बंधारे भरण्यात यावेत. तालुक्यात खरीप हंगाम वाया गेला असल्याने तीव्र चारा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मागेल त्या ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे.आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव, जालिंदर देसाई, माणिक भोसले, उदय शिंदे, भीमसेन भोसले, विजय ओलेकर आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शैक्षणिक शुल्क माफ कराकवठेमहांकाळ तालुक्यात पशुव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लाळ व खुरकत या रोगांच्या लसी त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. दुष्काळी स्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. तसेच वीज बिलेही माफ करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कवठेमहांकाळ येथे तालुुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात आप्पासाहेब शिंदे, माणिकराव भोसले आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी