शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:38 IST

तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने पिके पूर्ण वाया गेली आहेत.

ठळक मुद्देतालुका काँग्रेसची मागणी-तहसील कार्यालयावर मोर्चा

कवठेमहांकाळ : तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने पिके पूर्ण वाया गेली आहेत. शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट असताना, शासनाने कोणत्याही प्रकारची बियाणे, खते याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले नाही. शासनाने फेरसर्वेक्षण करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात म्हैसाळ व टेंभू योजनेचे पाणी सोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील पाझर तलाव, लघुपाटबंधारे तलाव, तसेच अग्रणी नदीवरील बंधारे भरण्यात यावेत. तालुक्यात खरीप हंगाम वाया गेला असल्याने तीव्र चारा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मागेल त्या ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे.आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव, जालिंदर देसाई, माणिक भोसले, उदय शिंदे, भीमसेन भोसले, विजय ओलेकर आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शैक्षणिक शुल्क माफ कराकवठेमहांकाळ तालुक्यात पशुव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लाळ व खुरकत या रोगांच्या लसी त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. दुष्काळी स्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. तसेच वीज बिलेही माफ करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कवठेमहांकाळ येथे तालुुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात आप्पासाहेब शिंदे, माणिकराव भोसले आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी